प्रतिनिधी/ सातारा
शहरात देवी चौकात गेल्या दीड आठवडय़ापूर्वी एक काम करायला पालिकेचे कामगार गेले अन झाले दुसरेच.त्यामुळे ठेकेदाराने गटरच्या कामाची खुदाई केली.कसलेही नियोजन न करता ठेकेदाराने लगीनघाई करत गेल्या आठ दिवसांपूर्वी उकरून ठेवले आहे. या उकरून ठेवलेल्या खडय़ात चार दिवसांपूर्वी एक महिला पडून जखमी झाल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. बांधकाम सभापती मिलिंद काकडे यांनीच लक्ष घालून हे काम चटकन करून घ्यावे, अशी मागणी होत आहे.
सातारा पालिकेच्यावतीने देवी चौक परिसरात एक समस्या उदभवल्याने पालिकेचा एक विभाग ती समस्या सोडवण्यासाठी तत्परतेने गेला.काम करताना झाले दुसरेच.त्यामुळे त्यांच्याऐवजी बांधकाम विभागाच्या बोकांडी हे ओझं पडले.बांधकाम विभागात मग लगेच काहींनी ठेकेदाराला सूचना केल्या.गेल्या आठवडय़ात ठेकेदाराने ही लॉक डाऊनमध्ये तेवढंच काम म्हणून घाई करत कामाला सुरुवात केली.कसलही नियोजन न करता त्यांनी उकरून टाकले.टाकलेल्या मातीत तीन वर्षांपूर्वी लावलेली झाडेही गाडली गेली.जाणारे येणारे सातारकर हे सारं पहात होते.पण करणार काय?,बोलणार काय?,सांगणार कोणाला?,पालिकेत सांगावं तर कार्यवाही होत नाही.अन आवाज उठवावा तर झेंगट उगाच मागे त्यामुळे दिसत असून ही चुप्पी साधली होती.त्यातच पाच ते सहा दुकानदार, काही रहिवासी तेथून पाठीमागच्या बाजूने जातात.चार दिवसांपूर्वी एक महिला तेथून जाताना खडय़ात पडून जखमी झाल्याची जोरदार चर्चा आहे.दरम्यान, हे काम घेतलेला ठेकेदार तर कसलेही नियोजन न करता काम करतो. त्यांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत.पालिकेचे बांधकाम विभागाचे हे काम लवकर व्हावे, याकरता तेथील स्थानिक नागरिकांनी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगराध्यक्षा सौ.माधवी कदम, स्थानिक नगरसेवक यांना ही सांगून पाहिले पण काम कधी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.पालिकेने हे काम लवकर करावे यासाठी बांधकाम सभापती मिलिंद काकडे यांनीच लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.