प्रतिनिधी/ सातारा
aशरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप झालेले गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ एक वर्षानंतर पुन्हा सातारा गटशिक्षणाधिकारी म्हणून त्याच पदावर शुक्रवारी हजर झाले आहेत. धुमाळ अचानक हजर झाल्यामुळे या केसमध्ये नक्की काय झाले याबद्दल जिल्हापरिषद प्रशासनाकडे कोणतीही माहिती नसल्यामुळे धुमाळ यांच्याबाबत शिक्षण क्षेत्रात तर्कवितर्क उपस्थित होत आहेत. तर संबंधित महिलेने या निर्णयाबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.
गतवर्षी साताऱयाचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्यावर एका महिला शिक्षिकेने माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली असल्याचा आरोप केला होता. याबाबत धुमाळ यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दरम्यान, धुमाळ यांची खातेनिहाय चौकशीही सुरू झाली. त्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु असतानाही महाराष्ट्र शासनाने चक्क त्याच गटशिक्षणाधिकाऱयास पुन्हा त्याच ठिकाणी म्हणजे सातारा गटशिक्षणाधिकारी म्हणून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पीडित महिलेसह अनेकांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आरोप असलेल्या धुमाळ यांना पुन्हा त्याच पदावर व त्याच पंचायत समितीमध्ये कशी काय नेमणूक केली याबाबतही प्रश्न विचारला आहे. धुमाळ यांच्यावरील आरोपानंतर साताऱयाच्या शिक्षण क्षेत्रावर प्रचंड टीका झाली होती. यामुळे शिक्षणाधिकारी व जिल्हा प्रशासनाने या घटनेची दखल घेतली होती. यावर चौकशी समितीही नेमली होती. या समितीसमोर धुमाळ व पीडित महिलेला स्वतंत्रपणे बाजू मांडण्यासही सांगितले होते.
दरम्यान, धुमाळ यांच्यावर न्यायालयात सुनावणी सुरु असताना शासनाने दिलेल्या निर्णयानुसार त्याने शुक्रवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. त्यामुळे पीडित महिला कर्मचारी भयभित झाली आहे. याबाबत शिक्षण विभागाचे चोपडे यांना विचारणा केली असता त्यांनी संबंध्ंिात गटशिक्षणाधिकाऱयांनी शासनाकडून आदेश आणला असून त्यानुसार आहे त्या पदावर काम सुरु केले आहे असे सांगितले. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, त्याच तालुक्यात हजर राहत असल्याने भितीचे वातावरण असल्याबाबतची शक्यता गृहीत धरुन तसे आम्ही शासनाला कळवतो आहे. शासनाकडून पुढील आदेश आल्यानंतर कार्यवाही केली जाईल असे त्यांनी सांगितले.