प्रलंबित मागण्या तत्काळ मान्य करण्याची मागणी
अन्यथा आझाद मैदानावर बेमुदत उपोषण
कोल्हापूर /प्रतिनिधी
राज्य शासनाच्या सहकार विभागाकडून विकास सेवा संस्थेचे ताळमेळ घेण्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याबाबत आदेश दिले आहेत. मात्र गटसचिवानी त्यावरती बहिष्कार टाकल्याने ते काम ठप्प झाले. काम तात्काळ करा अन्यथा सेवा संस्थेतील इतर कर्मचाऱयांना सहीचे अधिकार देऊन पूर्ण करा अशा आशयाचा संदेश जिल्हा उपनिबधकांनी व्हॉटसऍप्द्वारे दिल्यामुळे जिह्यातील गटसचिवातून तिव्र संतात व्यक्त केला जात आहे. सचिवांच्या नोकरीवर गंडांतर आणणारा हा निर्णय तत्काळ मागे घेण्यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा सचिव संघटनेच्यावतीने शुक्रवारी धरणे आंदोलन करून निषेध केला. मागण्यांचे निवेदन जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांना दिले.
राज्य शासनाच्या सहकार विभागाकडून विकास सेवा संस्थांचा ताळमेळ घालण्याचे काम तात्कळ पूर्ण करण्याचे परिपत्रक नुकतेच दिले आहे. मात्र राज्यातील गट सचिवांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य गट सचिव संघटनेच्या पदाधिकाऱयांनी सहकार विभागाकडे मागणी केलेली आहे. त्याचा सहकार विभागाने गंभीर स्वरूपात विचार न केल्यामुळे राज्य गट सचिव संघटनेने सहकार विभागाच्या विकास सेवा संस्था ताळमेळ कामकाजावरती बहिष्कार टाकला आहे. हा बहिष्कार मागे घेण्यासाठी सहकार विभागाने कोणतीही चर्चा न करता गट सचिवांचे आंदोलन दाबण्याच्या हेतूने गटसचिवाशिवाय त्या संस्थेतील अन्य कर्मचाऱयामार्फत ताळमेळचे काम पूर्ण कण्रयाच्या हालचाली सुरु केल्या आहेत. .त्यामुळे गट सचिवांच्या अस्तित्वावरच गदा आणणारी भूमिका सहकार खात्याने घेऊन त्याबाबतचा संदेश व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दिलेला आहे. त्यामुळे या संदेशाच्या विरोधात जिल्हा गट सचिव संघटनेने आक्रमक भूमिका घेऊन ठिया आंदोलन केले.
गटसचिवांना शासकीय सेवेत समावून घ्यावे, सचिवांना ग्रामसेवकांप्रमाणे समान काम, समान वेतन द्यावे, राज्यातील गटसचिवांचे वेतन थकीत न ठेवता दरमहा नियमितपणे द्यावे, राज्यातील मयत झालेल्या गटसचिवांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर सेवेत समावून घ्यावे व रिक्त पदे तत्काळ भरावीत. राज्यातील जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने नियुक्त केलेल्या सचिवांचे संवर्गीकरण यंत्रणेत समायेजन करावे. संस्था सक्षमीकरणाचा निधी हा सर्व संस्थांना विनाअट सरसकट मिळावा, संस्था सक्षमीकरण अनुदानातील संस्था व्यवास्थापन खर्चाची अट रद्द करावी. या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास सर्व कामांवर बहिष्कार टाकून मुंबई येथे आझाद मैदाना बेमुदत उपोषण केले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
धरणे आंदोलनामध्ये सचिव संघटना अध्यक्ष रमेश चौगुले, उपाध्यक्ष विजय शिंदे, धनाजी पाटील , जालिंदर रेडेकर , राज्य संघटना प्रतिनिधी पुंडलिक खोडवे , सचिन गोटखिंडे , जिल्हा संघटना प्रतिनिधी दत्तात्रय पाटील, गणपती बिरजे , अनिल आबदार , संभाजी पाटील , आनंदा पाटील,सिकंदर सुतार, जालिंदर पाटील आदींसह जिह्यातील बहुसंख्य सचिव उपस्थित होते.