प्रतिनिधी /वाळपई
नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत नगरगाव मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला दारुण पराभव स्वीकारावा लागला.यामागची कारणे अनेक आहेत मात्र मतदार संघातील 25 घरापर्यंत सुध्दा पक्षाचा वचननामा गेला नाही हे खरोखरच दुर्दैव आहे. गट समिती फक्त कागदी घोडे नाचून पक्षाच्या नेतृत्वाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशाने पक्षाची अवस्था आणखी दयनीय होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही.
यामुळे पक्षनेतृत्वाने आता राणे होऊन वाळपई मतदार संघातील समितीची पुनर्रचना करावी अशी मागणी मतदार संघ सेवा समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आलेली आहे. या पत्रकार परिषदेतून गट समितीवर निषक्रियतेचा आरोप करण्यात आला.
याबाबतची माहिती अशी की येणाऱया विधानसभेत वाळपई मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा आमदार निवडून यायचा असेल तर आतापासूनच कामाला लागणे अत्यंत गरजेचे आहे. ासाठी पक्ष नेतृत्वाला काही कणखर निर्णय घ्यावे लागेल .यात सध्याची अस्तित्वात असलेली समिती बरखास्त करणे व नवीन नेतृत्वाखाली समितीची नियुक्ती करणे अत्यंत गरजेचे असल्याचे समितीचे उपाध्यक्ष हरिश्?चंद्र मानकर यांनी स्पष्ट केले आहे .गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्याची व गट समितीच्या सर्व पदाधिकाऱयांची महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये बऱयाच प्रमाणात खडाजंगी झाले याची गांभीर्याने दखल पक्षनेतृत्वाने घेणे गरजेचे आहे .अन्यथा मतदारसंघात पक्षाची अवस्था वाईट होणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. यावेळी बोलताना रणजीत राणे यांनी सांगितले की येणाऱया विधानसभेसाठी काँग्रेस पक्षातर्फे आपण प्रमुख दावेदार आहे .पक्षाने आपल्याला काम करण्याचा सल्ला दिलेला आहे. यामुळे मतदार संघातील सर्व केंद्रावर आपण कार्य सुरू केलेले आहे. सभासद नोंदणी करण्यावर भर देण्यात आलेला असून त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभत असल्याचे रणजीत राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. गिरीश चोडणकर यांनी संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून केलेला आवाहनाला अनुसरून आपण कामाला सुरुवात केलेली असून त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोवीड रोगामुळे मतदार संघातील अनेक कुटुंबावर आघात निर्माण झाले. त्यांना भावनिक आधार देणे गरजेचे होते. मात्र यासाठी मतदार संघाचे आमदार आरोग्यमंत्री विश्वजित राणे कमी पडले .गिरीश चोडणकर यांनी या सर्व कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली व येणाऱया काळात पक्षातर्फे त्यांना आधार देण्यासंदर्भात आश्वासन दिलेले आहे.