ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ì^ातील गडकिल्ल्यांवर दारु पिऊन गैरवर्तन करणाऱयांना आता सहा महिन्यांचा सश्रम तुरुंगवास आणि 10 हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे. राज्याच्या गृहविभागाने यासंदर्भात निर्णय घेतला आहे.
राज्यातील गडकिल्ल्यांवर दारु पाटर्य़ा, आणि धिंगाणा घालण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून घडत आहेत. अशा प्रकारांमुळे किल्ल्यांचे पावित्र राखले जात नाही. राज्यात 350 च्या वर गडकिल्ले आहेत. हे राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यामुळे गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे.
यापुढे गडकिल्ल्यांवर दारु पाटर्य़ा, दारु पिऊन गोंधळ घालणे यासारख्या प्रकारांना महाराष्ì^ दारूबंदी अधिनियमाच्या कलम 85 अंतर्गत सहा महिन्यांचा सश्रम तुरुंगवास आणि 10 हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तर या प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास एक वर्षापर्यंत कारावास होणार आहे.