आंबा, काजू बागायदार हवालदिल : अचानक पावसाने तारांबळ
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात बुधवारी अवकाळी पावसाने तडाखा दिला. जिल्हय़ात दुपारनंतर गडगडाटासह अनेक भागात जोरदार पाऊस झाला. या पावसाने आंबा व काजू कलमांना आलेल्या मोहोराला फटका बसणार असल्याने शेतकरी, बागायदार हवालदिल झाले आहेत. बुधवारी अचानक पडलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.
सिंधुदुर्गात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तसेच हवामान खात्यानेही जिल्हय़ात तुरळक पाऊस पडेल, अशी शक्मयता वर्तवली होती. त्यानंतर बुधवारी दुपारी तीन वाजल्यानंतर जिल्यात गडगडाटासह पाऊस झाला. मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी तालुक्मयात जोरदार पाऊस झाला. अन्य तालुक्मयातही हलक्या सरी कोसळल्या. यावषी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पाऊस होता. त्यामुळे ऐन भात कापणीच्या वेळी पाऊस सुरूच राहिल्याने शेतकऱयांच्या भात पिकाचे अतोनात नुकसान झाले. यामधून शेतकरी काही प्रमाणात सावरत असतानाच पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी, बागायतदार धास्तावले आहेत.
जिल्हय़ात नुकतीच कुठे आंबा व काजू कलमेही मोहोरू लागली होती. मात्र बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने या मोहोराला फटका बसणार आहे.
सावंतवाडी तालुक्यात जोरदार पाऊस
सावंतवाडी : पहाटे कडाक्याची थंडी अन् दाट धुके पडू लागले असतानाच बुधवारी दुपारी सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांवर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. यंदा पाऊस ऑक्टोबर अखेरपर्यंत पडला. आंबोली घाटात दाट धुके सुरू आहे. अशा वातावरणात बुधवारी दुपारनंतर पावसाने सुरुवात केली. कलंबिस्त, सांगेली, ओवळिये, पारपोली, धवडकी भागात मुसळधार पाऊस पडला. सावंतवाडी शहरात तब्बल अर्धा तास पाऊस पडत होता. अचानक पाऊस आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या आठवडय़ापासून रब्बी, वायंगणी भातशेती, पेरणी व मिरची, कांदा पीक हंगाम सुरू झाला आहे. पावसामुळे रब्बी पीक धोक्यात आले आहे. यंदा पावसाळी भातशेती वाया गेली.