ऑनलाईन टीम / गडचिरोली
गेल्या काही दिवसांपुर्वी छत्तीसगड येथे नक्षली हल्ल्यात भारताचे तब्बल २२ जवान शहीद झाले होते. याला काही दिवस होतात न होतात तोच पुन्हा एटापल्ली तालुक्यातील जांभिया-गट्टा पोलीस ठाणे जंगल परिसरात चकमक झाली आहे. या चकमकीत पोलिसांनी दोन दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
गेल्याच आठवड्यात म्हणजे २२ एप्रिल रोजी मध्यरात्री नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. हा हल्ला पोलिसांनी चोख प्रतिउत्तर देत परतवून लावला. यावेळी नक्षलवाद्यांनी एका हँडग्रेनेडचा वापर करत पोलीसांवर प्रतिहल्ला चढवला होता. यानंतर पोलीसांनी शोधमोहीम राबवली . यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुद गोळीबार केला. पोलिसांनी त्यास प्रत्यत्तर देत गोळीबार केला असता चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलीस दलास यश आले.
२६ एप्रिल रोजी नक्षलवाद्यांनी अहेरी तालुक्यातील मेडपल्ली – तुमरगुडा रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केली होती. यात पाण्याचे दोन टँकर, तीन ट्रॅक्टर व एक जोहान डिअर ट्रॅक्टरचा समावेश आहे.