दिल्ली / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी पोलिस आणि सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत भारताचा मोस्ट-वॉन्टेड नक्षल क्षेत्र कमांडर मिलिंद तेलतुंबडे ठार झाला. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सीपीआय (माओवादी) चा प्रमुख कार्यकर्ता ठार झाल्याची पुष्टी केली. या चकमकीत एकूण २६ नक्षलवादी ठार झाले आहेत. काही मृतदेहांची ओळख पटली असली असून काहींची अजून पटलेली नाही. वळसे-पाटील यांनी मुंबईत पत्रकारांना सांगितले.
मिलिंदच्या डोक्यावर 50 लाखांचे बक्षीस होते आणि तो राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) व्यतिरिक्त महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील पोलिसांना हवा होता. इतर प्रकरणांपैकी तेलतुंबडे हा एल्गार परिषद-भीमा कोरेगाव प्रकरणी वॉन्टेड आहे. पन्नाशीच्या मध्यात असलेले तेलतुंबडे हे केंद्रीय समितीचे सदस्य असण्यासोबतच सीपीआय (माओवादी) च्या महाराष्ट्र राज्य समितीचे (एमएससी) सचिव होते. योगायोगाने, मिलिंदचा भाऊ l आनंद तेलतुंबडे आहेत, ज्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या बहिणीशी लग्न केले आहे. आनंद तेलतुंबडे हे गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे वरिष्ठ प्राध्यापक आहेत.