गडहिंग्लज आगारातील चित्र,पंधरा दिवसापासून दररोज लाखाचे उत्पन्न,पुढील सुनावणी 5 जानेवारीला होणार लालपरीची अजून किती ? वाट पहायची
गडहिंग्लज / रोहित ताशिलदार
एसटी महामंडळातील कर्मचारी, चालक, वाहक यांनी विविध मागण्यासाठी राज्यात गेल्या दोन महिन्यापासून संप पुकारला आहे. ग्रामीण भागातील प्रवासी, शाळकरी मुले आणि पासधारकांचे मोठे नुकसान होत आहे. या 60 दिवसात ग्रामीण भागातील अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी थांबून असल्याने गडहिंग्लज आगाराचे अंदाजे 35 कोटीचे नुकसान झाले आहे. आगारात गेल्या पंधरा दिवसापासून काही कर्मचारी कामावर हजर झाल्याने दररोज एक लाखापर्यंत उत्पन्न मिळत आहे.
एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण या प्रमूख मागणसाठी नोव्हेंबर महिन्यातील दिवाळी सणापासून कर्मचारी, चालक, वाहकांनी संपाचे हत्यार उपसले. आणि राज्यात लालपरीची चाके थांबली. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मंदावली असून शाळा, महाविद्यालये, लहान मोठया व्यवसाय करणारी प्रवासांचे हाल सुरू झाले. खासगी वाहतूकीला अच्चे दिन आले पण महामंडळाचे दिवसगणीत 7-8 लाखाचे नुकसान होवू लागले. गडहिंग्लज आगारातून दररोज 10-15 हजार किलोमीटर आंतर लालपरी धावत होती. पण संपामुळे काही दिवस एकही किलोमीटर धावली नाही. सध्या चालक 12 आणि 19 वाहक कामावर हजर असल्याचे स्थानक प्रमूख राजेश मातले यांनी सांगितले.
राज्य सरकार आपल्या पातळीवर विविध बैठका, चर्चा केले पण कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम होते. संपावर तोडगा निघण्याची चिन्हे दिसत नसताना कर्मचारी संघटनेने न्यायालयात गेले. शासनाकडून कामावर हजर होण्याचे आवाहन वेतन वाढीचा पर्याय समोर ठेवला. याला काही कामावर संघटनेचा विरोध तर काही संघटनेला मान्यता दिली. यामुळे आंदोलनात चिरडण्याचा प्रयत्न देखील झाला. पण शासनात विलीनीकरणाशिवाय कामावर हजर होणार नसल्याची ठाम भुमिका घेतल्याने शासनाची पुन्हा अडचणी वाढल्या आणि प्रवासांना आणखी ज्यादा पैसे मोजावे लागले. विलीनीकरणाचा निर्णय न्यायप्रविष्ठ असल्याने थांबल्याशिवाय पर्याय समोर दिसत नाही. गेल्या दोन महिन्यापासून ग्रामीण भागातील प्रवासी, विद्यार्थ्यांना खासगी वाहतूकीचे दर परवडेना झाले आहेत. कोरोना, महापूर आणि अवकाळीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळीत झाली असल्याने कमी दरात महामंडळाची वाहतूक करणे सोपे असल्याने सर्वत्र लालपरी कधी आगाराबाहेर पडते याकडे डोळे लागले आहेत. 5 जानेवारीला पुढील सुनावणी असून तोडगा निघणार की ? पुन्हा चिघळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले.
प्रवाशाकडून भावनिक आवाहन
गेल्या दोन महिन्यापासून लालपरी बंद असल्याने प्रवासी खासगी वाहतूकला कंटाळे आहेत. वेळेवर घरी जाण्यासाठी सोय नसल्याने आर्थिक, मानसिक प्रश्न निर्माण होत आहेत. लालपरीमुळे सर्वच काही वेळेवर आणि खर्च आवाक्यात होत नसल्याने लालपरी लवकर सुरू व्हावी असे भावनिक आवाहन प्रवाशांतून होत आहे.