विशाल कदम/ सातारा
जिह्यातील 1732 गावांपैकी अनेक गावांत केवळ वयोवृद्ध व्यक्ती असायच्या. बाकीच्या पोटापाण्यासाठी पुण्यमुंबईत असायचे.महात्मा गांधीजीनी खेडय़ाकडे चला हा संदेश दिला होता.त्याच्या उलटंच चित्र गेल्या दहा वर्षात तयार झाले होते.पटसंख्येअभावी गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडण्याची अवस्था झाली होती.यावर्षी उलट चित्र असून कोरोनाच्या दहशतीमुळे पुण्यामुंबईतले चाकरमानी गावात तळ ठोकून आहेत.त्यांनी आपल्या मुलांना गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ऑन लाईन प्रवेश मिळवला आहे.सातारा जिह्यात नवीन प्रवेश 6हजार 477 झाले आहेत.दुसर्या शाळेतून प्रवेश 520 तर एकूण 6हजार 997 प्रवेश झाले आहेत. पहिलीसाठी प्रवेश 6हजार244
इतर वर्गाचे प्रवेश 753 झाले आहेत.त्यामुळे गडय़ा आपल्या गावची झेडपीची शाळा बरी असाच सूर आता दिसू लागला आहे.
महात्मा गांधी यांनी खेडय़ाकडे चला हा संदेश दिला होता.मात्र, त्याच्या उलट चित्र निर्माण झाले होते. खेडी भकास आणि शहरे हाऊसफुल्ल झाली होती.गावाकडे वयोवृद्ध फक्त आणि तरुण सगळे पुण्यामुंबईत दिसायचे.या चित्रांमुळे राज्य शासनाने ही गावाकडे कमी पट असलेल्या शाळा ही बंद करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार सातारा जिह्यातल्या काही कमी पटाच्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या.कोरोनाचे जगावर संकट कोसळले आणि त्या संकटात शहरे लॉक डाऊन झाली.एक महिना, दोन महिने, तीन महिने झाले तरी कोरोनाचा कहर कमी होत नाही.काही चाकरमानी लॉक डाऊनच्या सुरुवातीलाच गावाकडे सापडेल त्या वाहनाने आले.गावात राहू लागली.गावात चाकरमानी आल्याने गावे गावात गर्दी दिसू लागली.कोरोनाच संकट शहरकडून गावाकडे आलं असलं तरी गाव ते गावच.त्यात आपल्या मुलांना आता गावच्या शाळेतच घालायचे येथेच शिकवायचे म्हणून ऑनलाइन प्रवेश घेतले.जिल्हा परिषदेच्या शाळा प्रवेश नोंदणी हाऊस फुल झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत दर्जेदार शिक्षण
सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांत दर्जेदार शिक्षण दिले जाते.ग्रामीण भागातील शाळांमध्ये भौतिक सुविधा दिल्या जातात.काही शाळा सौर शाळा आहेत.शाळांमध्ये विद्यार्थाकरता जिम आहे.संगणक शिक्षण दिले जाते.