प्रतिनिधी/ वाळपई
चार दिवसांपासून सुरु होणाऱया गणेश चतुर्थीसाठी सत्तरी तालुका सज्ज झालेला आहे. वाळपईची बाजारपेठ सजली असून विविध वस्तूंच्या खरेदीसाठी गणेशभक्तांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
माटोळी सामानाच्या बाजारासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार असून यासाठी त्यांच्या विक्रीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ठरावीक जागा देऊन सामाजिक अंतराचे नियम पाळण्याचे निर्देश देण्यात आले असून त्याचे तंतोतंत पालन करण्याच्या दृष्टिने नगरपालिका यंत्रणा कार्य करत असल्याची माहिती नगराध्यक्ष सेहझीन शेख यांनी दिली.
याबाबतची माहिती अशी की, उद्या बाप्पाचे प्रत्येकाच्या घरोघरी आगमन होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महागाईत वाढ होऊ लागलेली आहे. याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसताना दिसत आहे. यामुळे यंदाची गणेश चतुर्थी महागाईचा चटक्मयामध्ये साजरे करावी लागणार असल्यामुळे गणेशभक्तांमध्ये काही प्रमाणात नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.
माटोळी बाजाराला परवानगी.
दरम्यान, वाळपईच्या नगराध्यक्षा सेहझीन शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माटोळी बाजारासाठी नगरपालिकेने परवानगी दिलेली आहे. मात्र सामाजिक अंतरांचे पालन व्हावे, याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. फातिमा कॉन्व्हेंट मार्गावर माटोळी बाजार भरणार आहे. यासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिक वेगवेगळय़ा प्रकारचे माटोळीचे सामान घेऊन त्याची विक्री करण्यासाठी वाळपई बाजारामध्ये गर्दी करत असतात. यंदा मात्र गर्दी होणार नाही याची विशेष दखल घेण्यात आलेली आहे. मात्र कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षानी यावेळी स्पष्ट केले.
गणेशमूर्ती सजल्या
सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा ठिकाणी गणेशमूर्ती सजवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अनेक शाळांमध्ये तयार झालेल्या गणेशमूर्ती विशेष लक्ष वेधून घेत आहेत. वेगवेगळय़ा ठिकाणी चित्र शाळेमध्ये या मूर्तींचे रंगकाम पूर्ण होऊन सजल्या आहेत. कोविड काळ व दिवसेंदिवस वाढती महागाई यांच्या पार्श्?भूमीवर गणेशभक्तांना काही प्रमाणात दिलासा मिळण्यासाठी यासाठी सत्तरी तालुक्मयात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या पुढाकाराने प्रत्येक घराघरात विशेष सामान वितरित करण्यात आलेले आहे. यामध्ये खास करून धान्यांचा समावेश आहे. यामुळे नागरिकांच्या खिशाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरीसुद्धा वाळपईच्या बाजारपेठेवर याचा अंशतः परिणाम होत असल्याचे व्यवसायिकांनी स्पष्ट केले आहे.