पाणीपुरवठय़ाची जबाबदारी घेतलेल्या एल ऍण्ड टी कंपनीचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असूनही पाणीपुरवठय़ाची जबाबदारी घेतलेल्या एल ऍण्ड टी कंपनीने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. उन्हाळा सुरू होत असून त्यावेळी पाणी कपात दरवषी बेळगावकरांच्या माथी मारली जाते. मात्र अशा वाया जाणाऱया पाण्याचे काय, हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
गणेशपूर रोडवरील गुडशेफर्ड शाळेसमोरील दुभाजकाखालील जलवाहिनीला गळती लागली आहे. गेल्या आठ दिवसांपासून या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे नागरिक पाहत आहेत. माध्यमांनी याबाबत लक्ष वेधले तरी अद्याप एल ऍण्ड टीने त्याचे गांभीर्य ओळखले नाही, हे दुर्दैव होय, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. जलाशयात पुरेसा पाणीसाठा असल्याचे सांगणारे प्रशासनसुद्धा या पाणी गळतीकडे कानाडोळा का करत आहे? हा ही प्रश्न आहे.
या पाण्यामुळे तेथील नागरिकांना आणि ये-जा करणाऱया लोकांना पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. जिल्हाधिकाऱयांनी याची दखल घ्यावी व पाणीपुरवठा करणाऱया कंपनीच्या अधिकाऱयांना त्वरित ही जलवाहिनी दुरुस्त करून पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी होत आहे.