प्रतिनिधी/ बेळगाव :
गणेशोत्सवावर बंदी घालू नये, पारंपरिक पद्धतीने आम्हाला गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी. शेतकऱयांना खते उपलब्ध करावीत, शेतकऱयांना देण्यात आलेल्या खराब बियाणांमुळे नुकसान झाले असून बियाणे पुरवठा केलेल्या कंपन्यांवर कारवाई करावी, यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
कोरोनामुळे सर्वसामान्य जनता अडचणीत सापडली आहे. बेळगाव जिह्यामध्ये गणेशोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, या उत्सवावरच बंदी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो थांबवावा. आम्ही योग्य ती काळजी घेऊन गणेशोत्सव साजरा करू. तेव्हा गणेशोत्सवाला दरवषीप्रमाणे यावषीही मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱयांना खत पुरवठा वेळेत करण्यात येत नाही. खताचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. तेव्हा खत उपलब्ध करावे, याचबरोबर खराब बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार करावेत. खासगी हॉस्पिटलमध्येही त्यांच्यावर उपचार करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू पाटील, दुर्गेश मेत्री, जोतिबा पाटील, दीपक नार्वेकर, हितेश गाडेकर, गजानन मोदगेकर, अमृत पवार, पंकज जाधव, शिवाजी लाड, विनायक बाचोळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थि