वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवे शिक्षण धोरण भारताला शिक्षणाचे केंद्र म्हणून स्वतःचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यास मदत करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणा मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केले आहे. ओडिशाच्या केंद्रीय विद्यापीठाच्या 12 व्या स्थापनादिनामित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि ओडिशाचे राज्यपाल गणेशी लाल देखील सामील झाले आहेत.
अनेक देशांना शैक्षणिक कौशल्यासाठी भारताने आकर्षित करण्याचे एक युग होऊन गेले आहे. नव्या शिक्षण धोरणाद्वारे जागतिक दर्जाचे शिक्षण प्राप्त करण्याची आता वेळ असल्याचे निशंक म्हणाले. तर राष्ट्रपती कोविंद यांनी विद्यार्थी आणि तरुण-तरुणींचा विकास तसेच विकासासाठी मूल्याधारित शिक्षणाच्या आवश्यकतेवर भर दिला आहे.
देश नव्या शिक्षण धोरणाच्या अंतर्गत पारंपरिक ज्ञानाचा वापर करतील अशी आशा राज्यपाल गणेशी लाल यांनी व्यक्त केली आहे. नवी उंची गाठविण्यासाठी अधिक सहकार्याच्या महत्त्वावर केंद्रीय पेट्रोलियम तसेच इस्पात मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भर दिला आहे.