अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार 15 फेब्रुवारी 2022, सकाळी 10.30
● 47 दिवसानंतर जिल्ह्याची बाधित वाढ 50 च्या खाली
● आठ तालुके दहाच्या आत बाधित
● पाटण, माण, खंडाळा आणि वाई तालुक्यात सर्वात कमी बाधित
● पॉझिटिव्हीटी रेट 3.15 वर
● जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील बाधित वाढ फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात दिलासादायक अशी राहिली. बाधित वाढ घटू लागली असून तब्बल 47 दिवसानंतर बाधित वाढ ही 50 च्या खाली आली आली आहे. मंगळवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात 1461 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले असून 45 जण नव्याने बाधित आढळून आले आहेत. पॉझिटिव्हीटी रेट हा 3.15 वर आलेला आहे. गेल्या महिन्यात मृत्युदर हा 0.68 टक्के एवढा राहिला आहे.
रुग्ण वाढ होऊ लागली कमी
जानेवारी महिन्याच्या 1 तारखेला बाधित वाढ उसळी घेऊ लागली होती. जानेवारी महिना हा जिल्ह्यातील वाढीचा काळ समजला गेला. मात्र, याच महिन्यात बरे होणारे आणि मृत्युदर स्थिर ठेवण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच नव्याने बाधित होणाऱ्यांचे प्रमाण कमी होत असल्याचे चित्र दिलासा दायक ठरू लागले. अखेर 47 दिवसांनी जिल्ह्याची बाधित वाढ ही 50 च्या खाली आलेली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात नव्याने होणारी बाधित वाढ आणि बरे होणाऱ्यांची संख्या चांगली आहे.
पाटण तालुक्यात नव्याने 1 जण बाधित
जिल्ह्यातील सर्वच 11 तालुक्यातील परिस्थिती आता चांगली होऊ लागली आहे. बहुतांशी सर्वच तालुक्यातील नव्याने बाधित हे दहाच्या आत येऊ लागले आहेत. शून्य गाठण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालानुसार कराड तालुक्यात 8, खंडाळा तालुक्यात 2, खटाव तालुक्यात 4, कोरेगाव तालुक्यात 8, माण तालुक्यात 2, पाटण तालुक्यात 1, फलटण तालुक्यात 5, सातारा तालुक्यात 13, वाई तालुक्यात 2 असे 45 जण नव्याने बाधित आढळून आले आहेत.
मंगळवारी
नमुने-1461
बाधित-45
मंगळवारपर्यंत
नमुने-25,34,059
बाधित-2,78,660
मृत्यू-6,655
मुक्त-2,70,169