वार्ताहर / यड्राव
रोजगारासाठी देशभरातून आलेल्या परराज्यातील नागरीकांची उपासमार होवू नये, या साठी यड्राव संस्कार पत्रकार संघ व दानशुर व्यक्तींनी केलेले कार्य उल्लेखनिय आहे. कोणीही दोन वेळच्या अन्नापासून वंचित राहू नये ही शासनाची भुमिका आहे. शिधापत्रिका नसलेल्या व इतर गरजू नागरीकांना धान्य वाटप करण्याचा संस्कार पत्रकार संघाचा पॅटर्न सर्वत्र राबविण्याची गरज आहे. असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
येथील संस्कार पत्रकार संघ व दानशुर व्यक्तींच्यां सहकार्याने शिधापत्रिका नसलेल्या व गरजु 550 कुटूंबाना धान्य वाटप प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर होते. यावेळी मंत्री यड्रावकर पुढे म्हणाले, केसरी शिधापत्रिकेच्या लाभापासून वंचित असलेल्या नागरीकांना मे व जुन महिन्यात माणसी 5 किलो धान्य वाटप करण्यात येणार आहे. यासाठी राज्यशासनाने 280 कोटी रूपयांची तरतुद केली आहे. 20 एप्रिलनंतर शेतीपुरक व विविध लघु उद्योग शासनाच्या नियमावली प्रमाणे सुरू होती. शासनाच्या सुचनेचे पालन 3 मे पर्यंत झाल्यास कोरोनावर मात करता येईल. पत्रकार संघाने इतक्या मोठ्या प्रमाणाता धान्य वाटपाचा केलेल्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्समुळे सुरक्षितता लाभली, हे कौतुकास्पद आहे.
यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक गणेश पाटील, शिरोळ तहसिलदार अपर्णा मोरे-धुमाळ, शहापुर पोलिस निरीक्षक प्रकाश निकम, माजी उपसभापती पं.स.शिरोळ सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर, जि.प.सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, सरपंच श्रीमती सुमन झुटाळ, उद्योजक कैश बागवान, डॉ.सुप्रिया माने, तलाठी नितीन कांबळे, ग्रामविकास अधिकारी व्ही.व्ही.गावडे, यासह संस्कार पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, दानशुर नागरीक उपस्थित होते. स्वागत धन:शाम कुंभार यांनी केले. प्रास्ताविक उपसरपंच विजय पाटील यांनी केले. तर आभार संतोष साने यांनी मानले.