भाजपाने महिलांना रस्त्यावर आणले–आरोप : जमिनीची मालकी हक्क द्यावा–मागणी
वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील गुळेली पंचायत क्षेत्रात शेळ मेळावली याठिकाणी होऊ घातलेल्या आयआयटी प्रकल्पाला विरोध काल होता, आजही आहे व भविष्यातही राहणार आहे. जोपर्यंत हा प्रकल्प या भागातून स्थलांतरित होत नाही तोपर्यंत या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन सुरूच राहणार आहे. सरकारने कितीही दडपण आणले तरी सुद्धा त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. भाजपाने या भागातील महिला भगिनींना रस्त्यावर आणले आहे. हा प्रकल्प सरकारला एवढय़ा जिव्हाळय़ाचा का वाटत आहे अशाप्रकारचा सवाल करून आज मोठय़ा प्रमाणात शेळ मेळावली भागात जमलेल्या नागरिकांनी पुन्हा एकदा आयआयटी प्रकल्पाला जोरदार विरोध केला. कोणत्याही परिस्थितीत या भागांमध्ये हा प्रकल्प होऊ देणार नाही अशा प्रकारचा निर्धार या भागातील नागरिकांनी केला आहे.
गुळेली पंचायत क्षेत्रातील शेळ मेळावली या ठिकाणी साडेतीन हजार कोटी खर्चून आयआयटी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने विरोध होताना दिसत आहे. मध्यंतरी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून या प्रकल्पाला होणारा विरोध कमी झाला अशा प्रकारची चर्चा निर्माण झाले होती. जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर पुन्हा एकदा या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. जिल्हा पंचायतीला भाजपाच्या सर्व उमेदवारांना मिळालेला अमाप प्रतिसाद हा प्रकल्पाच्या समर्थनार्थ नसून त्याचा चुकीचा अर्थ भाजपा लावत आहे. अशा प्रकारचा आरोप आज पत्रकारांशी बोलताना या भागातील विरोधकांनी स्पष्ट केला.
प्रकल्पाला विरोध शेवटच्या घटका पर्यंत.
दरम्यान या संदर्भात पत्रकारांशी बोलताना मेळवली ग्राम बचाव समितीचे सहनिमंत्रक शुभम शिवलकर यांनी सांगितले की सत्तरीच्या लोकांनी या भागातील जमिनी सुरक्षित राहण्यासाठी सहकार्य देण्याचे भावनिक आवाहन केले. नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायतीचे मतदान यावरून या प्रकल्पाला सत्तरी तालुक्मयातील जनतेचा पाठिंबा असल्याचा कयास करणे चुकीचे आहे. मतपत्रिकेवर भाजपाचे चिन्ह होते. जनतेने भाजपाला मतदान केलेले आहे. आयआयटी प्रकल्पाला नाही असे असते तर सरकारने मतपत्रिकेवर भाजपच्या कमळ या ऐवजी आयआयटीचा लोगो घालणे अत्यंत गरजेचे होते. अशा पद्धतीने मतदान झाले असते तर या प्रकल्पाला सत्तरी तालुक्मयातील जनतेचा पाठिंबा असल्याचे आम्ही समजलो असतो .मात्र भाजपाला मिळालेली मतांची आघाडी याच्यावरून या प्रकल्पाला सत्तरी तालुक्मयातील जनतेचा पाठिंबा असल्याचे गृहीत धरणे चुकीचे असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट.
हा प्रकल्प स्थलांतरित होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार.
या प्रकल्पाच्या विरोधात गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने महिला भगिनी रस्त्यावर उतरून त्याला विरोध करीत आहेत. जोपर्यंत हा प्रकल्प इतरत्र स्थलांतरित होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार ग्राम बचाव समितीचे निमंत्रक शशिकांत सावर्डेकर यांनी यावेळी स्पष्ट केले .या प्रकल्पाचे फायदे सरकारने अजूनही स्पष्ट केलेले नाही. ?ल्या शेकडो वर्षापासून ज्या जमिनीवर या भागातील भूमिपुत्र आपला उदरनिर्वाह करीत आहे त्या जमिनी प्रकल्पाच्या घशात घालून या भागातील भूमिपुत्रांना वाऱयावर सोडण्याचे सरकारचे षडयंत्र असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला..
तर मुख्यमंत्री निवासस्थानी मोर्चा व आंदोलन.
जवळपास दोन महिन्यांपूर्वी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या भागामध्ये येऊन जर स्थानिकांना हा प्रकल्प नको असेल तर तो त्यांच्या माथ्यावर मारला जाणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र वाळपई आमदार तसा आरोग्यमंत्री विश्वजित राणे हा प्रकल्प या भागातच होणार अशाप्रकारची भीष्मप्रतिज्ञा करीत आहेत. यासंदर्भात तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त करण्यात आला. शुभम शिवलकर यांनी पुढे बोलताना सांगितले की आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱया काळात निर्णय घेण्यात येणार असून गरज पडल्यास मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानी मोर्चा व आंदोलन उभे करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
जमीनीची मालकी द्या.
एका बाजूने गोवा सरकार आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना राबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सत्तरी तालुक्मयामधील जमिनीच्या मालकी हक्काचा प्रश्न अजूनही प्रलंबित राहिलेला आहे. जर भूमिपुत्रांच्या नावावर त्यांच्या जमिनी नाहीत तर कृषी विकासाच्या माध्यमातून या भागातील शेतकरी आत्मनिर्भर कसा बनणार अशाप्रकारचा सवाल शेतकरी राम मेळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केला. यामुळे सरकारने या भागातील जमीन मालकीचा प्रश्न सोडवावा व या भागातील जमिनी भूमिपुत्रांच्या नावावर करून द्याव्यात अशा प्रकारची मागणी केली.
भाजपाने महिंलाना रस्त्यावर आणले.
गेल्या चार महिन्यापासून या भागातील महिला भगिनी या प्रकल्पाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. मात्र सरकारची यंत्रणा याची अजिबात दखल घेतलेली नाही. भाजपने या महिलांना रस्त्यावर आणले आहे. अशा प्रकारचा आरोप या भागातील महिला भगिनी केला.
वाळपईचे आमदार विश्वजीत राणे यांना हिंमत असल्यास त्यांनी या भागांमध्ये येऊन आपण आयटीच्या प्रकल्प याच भागामध्ये करणार असल्याचे घोषित करावे अशा प्रकारचे आव्हान यावेळी महिला भगिनींनी दिले.
कागदपत्रांची फेरफार चौकशी करा.
ज्या ठिकाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सदर जमिनीच्या कागदपत्रांमध्ये सरकारने फेरफार केलेला आहे. यासंदर्भाची माहिती माहिती हक्क कायद्यांतर्गत सत्तरी तालुक्मयाच्या उपजिल्हाधिकारीकडे मागण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी अनेक तक्रारी यासंदर्भात देण्यात आलेले आहेत. मात्र अजून पर्यंत त्या संदर्भाची कारवाई उपजिल्हाधिकारी केलेले नाही. माहिती हक्क कायद्यांतर्गत माहिती आल्यानंतर खऱया अर्थाने यामध्ये कोण दोषी आहेत या संदर्भाचा उलगडा होणार असल्याचे यावेळी शुभम शिवलकर यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाची तीव्रता अजिबात कमी झाली नाही.
या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनाची तीव्रता कमी झाल्याचा सूर व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्यासंदर्भात चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. आंदोलनाची तीव्रता अजिबात कमी झालेले नाही. ज्या ताकदीने आंदोलन उभे करण्यात झालेले आहे त्याच पद्धतीने येणाऱया काळातही या आंदोलनाची तीव्रता कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. जिल्हा पंचायत निवडणूक याचा कोणताही परिणाम या आंदोलनावर झालेला नाही. यामुळे तमाम नागरिकांनी गैरसमज करून घेऊ नये अशा प्रकारचे आवाहन मेळावली ग्राम बचाव समितीच्यावतीने करण्यात आलेले आहे.