ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाला रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे प्रभावित झालेल्या गरिबांना राष्ट्रीय अन्न – सुरक्षा कायद्यांतर्गत सप्टेंबर 2020 पर्यंत सरकारने मोफत धान्य पुरवठा करावा. अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान, यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून पर्यंत मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. सोनिया गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, गरिबांना सप्टेंबर महिन्यापर्यंत धान्य मोफत द्यावे तसेच जय गरीब अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत येत नाहीत, अशा नाही सरकारने सप्टेंबर पर्यंत धान्य उपलब्ध करून द्यावे.
लॉक डाऊन मुळे गरिबांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना प्रति 10 किलो धान्य देण्याचा कालावधी सप्टेंबर पर्यंत वाढवावा.
तसेच ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनाही धान्य मोफत द्यावे. कारण असे अनेक लोक आहेत, अन्नसुरक्षा कायद्यात लाभार्थी नाहीत. मात्र, त्यांच्यासमोर दोन वेळच्या जेवणाचीही चिंता आहे. त्यामुळे त्यांना ही धान्य दिले जावे असे ही त्यांनी यावेळी सांगितले.