ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लॉक डाऊनमुळे गरिबांसमोरील समस्या वाढल्या आहेत. त्यांच्यासाठी सरकारला 65 हजार कोटी रुपये खर्च करण्याची गरज आहे, असं आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज सांगितले.
देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. देशातील संपूर्ण व्यवहार ठप्प आहेत. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर देखील होतं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी आज चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.
यामध्ये कोरोना संकटाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? या संकटाचा सामना कसा करावा याबाबत चर्चा करण्यात आली.
ते म्हणाले, लॉक डाऊन वाढवून काही साध्य होत नाही. लॉक डाऊन हटवायचे असेल तर दिवसाला 20 लाा टेस्ट गरजेच्या आहेत. भारताला अमेरिकेच्या चौपट टेस्टिंग करावं लागेल, असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जागतिक महमारीचा फायदा कुठल्याही देशाला होत नसतो. मात्र काही देशांना कोरोनानंतर पुढे जाण्याची संधी आहे. भारताला देखील अधिक वाव आहे. भारत आपले वेगळे स्थान निर्माण करू शकतो.
पण यासाठी भारताने उद्योगधंदे, सप्लाय चेन, इंडस्ट्रीवर भर दिला पाहिजे. तसेच मनरेगा सारख्या विविध योजनांची अंमलबजावणी केली पाहिजे. त्याचबरोबर मास टेस्टिंग नंतरच ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो, असंही त्यांनी यावेळी सांगितले.