पंतप्रधान मोदींची घोषणा, कोरोना स्थितीमुळे घेतला निर्णय
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना काळात गरीबांच्या रोजगारात व्यत्यय आल्याने त्यांच्या पोषणासाठी विनामूल्य धान्य योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेला येत्या नोव्हेंबरपर्यंत कालावधीवाढ देण्यात आली आहे. मंगळवारी या निर्णयाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. 80 कोटी गरीबांना याचा लाभ मिळत आहे.
या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीब नागरीकाला महिन्याला 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि 1 किलो डाळ विनामूल्य देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ विषेशतः स्थलांतरीत गरीब कामगार आणि गरीब महिलांना होत आहे. या योजनेमुळे गरीबांच्या रोजच्या आवश्यक अन्नाची सोय काही प्रमाणात होत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना असे या योजनेचे नाव आहे.
या योजनेला येत्या सप्टेंबरपर्यंत कालावधीवाढ द्यावी, अशी मागणी काँगेस नेते राहुल गांधी यांनी केली होती. तथापि, पंतप्रधान मोदी यांनी योजनेला आणखी दोन महिने अधिकची वाढ दिली. त्यामुळे आता नोव्हेंबर अखेरपर्यंत या योजनेला लाभ देशातील 80 कोटी गरीबांना मिळत राहणार आहे.