प्रतिनिधी/ बेळगाव
सर्वच वकील श्रीमंत असतात असे नाही. काही वकिलांना आर्थिक मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, हे ओळखून बार असोसिएशनने मंगळवारी गरीब व गरजू वकिलांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ए. जी. मुळवाडमठ यांनी वकिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन केल्यानंतर सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. न्यायालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. वकील घरांमध्येच आहेत. त्यामुळे अनेक वकिलांना अडचणी भेडसावू लागल्या आहेत. याची दखल बेळगाव बार असोसिएशनने घेतली. त्यानंतर तातडीने जीवनावश्यक वस्तु खरेदी करून त्याचे वितरण करण्यास सुरुवात केली.
गरीब आणि गरजू वकिलांनी हे सर्व साहित्य घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 15 दिवस पुरेल इतके साहित्य देण्यात आले आहे. अजूनही आम्ही मदत करणार आहे. एकदा मदत घेतल्यानंतर कोणीही पुन्हा 15 दिवस तरी मदत स्वीकारू नये. कारण प्रत्येक गरीब वकिलाला मदत पोहोचणे महत्त्वाचे आहे, असे मुळवाडमठ यांनी सांगितले.
वकिलांना 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, 3 किलो कांदा, 1 किलो तूरडाळ यासह सर्व जीवनावश्यक वस्तु देण्यात आल्या आहेत. विकलांग असलेल्यांना हे साहित्य घरी पोहोचविण्याची जबाबदारीही घेण्यात आली आहे. बारचे अध्यक्ष ए. जी. मुळवाडमठ, जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ, ऍड. आण्णासाहेब घोरपडे, ऍड. एम. एम. णाविनकट्टी, आर. के. द्यामण्णावर, ऍड. आर. पी. पाटील, ऍड. आर. के. पाटील, ऍड. राजू बागेवाडी, ऍड. रमेश गुडगुडगी, ऍड. सुधीर जैन यांच्या उपस्थितीत हे साहित्य वितरण करण्यात आले.
वकिलांना साहित्य देण्यासाठी उपाध्यक्ष सी. टी. मजगी, ऍड. गजानन पाटील, जनरल सेपेटरी ऍड. आर. सी. पाटील, सदस्य कलमेश मायाण्णाचे, ऍड. श्रीधर मुतगेकर, ऍड. श्रीकांत पवार यांच्यासह इतर वकिलांनी प्रयत्न केले. बार असोसिएशनने घेतलेल्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.