प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील राजीवडा येथे दुचाकीवरून रूग्णालयात जाणाऱया गरोदर महिलेला तपासणी नाक्यावर पोलिसांकडून अडवण्यात आल्याने रहिवासी व पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाल़ी यावेळी मोठय़ा संख्येने राजीवडातील महिला पुरुष रस्त्यावर आल्याने परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होत़ी मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळण्यास मदत झाल़ी
राजीवडा येथे कोरोनाचा रूग्ण आढळल्याने शुक्रवार सायंकाळपासून हा परिसर सील करण्यात आला आह़े सोमवारी सकाळी या परिसरातील गर्भवती महिला दुचाकीवरून रूग्णालयात जाण्यासाठी निघाली होत़ी यावेळी पोलिसांनी या दुचाकीला अडवून रूग्णालयाची कागदपत्रे दाखवण्यास सांगितल़े गरोदर महिलेला पोलिसांकडून अडवण्यात आल्याचे वृत्त परिसरात पसरताच राजीवडामधील शेकडो महिला पुरूष रस्त्यावर आल़े
शेकडोंच्या संख्येने रहिवासी रस्त्यावर उतरल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होत़ी या घटनेची माहिती मिळताच उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, शहर पोलीस निरिक्षक अनिल लाड पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाल़े यावेळी पोलिसांनी स्थानिक नगरसेवक सुहेल मुकादम, गरोदर महिलेचे नातेवाईक व स्थानिकांशी चर्चा केल़ी त्यानंतर त्या महिलेला तपासणीसाठी रूग्णालयात पाठवण्यात आल्याने तणाव निवळला. कारोनाचा रूग्ण आढळल्यामुळे या ठिकाणचा परिसर सील करण्यात आला आह़े नागरिकांनी पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आल़े
राजीवडा परिसर सील करण्यात आला असला तरी अत्यावश्यक सेवेसाठी स्वयंसेवकांची नेमणूक परिसरात करण्यात आली आह़े त्यानुसार घरपोच सेवा देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आल़े कारोनाचा रूग्ण राजीवडा परिसरात आढळल्यानंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आह़े शनिवारी आरोग्य तपासणीच्या सर्वेसाठी गेलेल्या आरोग्य सेविकांना अटकाव केल्याप्रकरणी ााजी नगरसेवकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा तसेच संचारबंदी असताना देखील मच्छीमारी केल्याप्रकरणी 6 जणांविरूद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आह़े यामुळे हा परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणाव कायम आह़े
संचारबंदीचे उल्लंघन
गरोदर महिलेला पोलिसांकडून तपासणी नाक्यावर अडवल्याने मोठय़ा संख्येने लोक रस्त्यावर उतरले होत़े राजीवडा परिसरात कारोना रूग्ण सापडल्यानंतर हा परिसर अतिसंवेदनशील समजला जात आह़े राजीवडा येथे मोठय़ा संख्येने नागरिक रस्त्यावर आल्याने शासनाकडून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे उल्लंघन झाल़े यामुळे कारोना विषाणूचा संसंर्ग होण्याचा धोका वाढला आह़े