ऑनलाईन टीम / लेह :
गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी झेंडा फडकवत एकही इंच भूभाग न सोडण्याचा इशारा दिल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. या व्हिडिओत चीनने गलवान खोऱ्यात ध्वज फडकवल्याचा दावा केला होता. या दाव्याला पूर्णविराम देत आज भारतीय लष्काराने गलवान खोऱ्यात तिरंगा फडकवला.
चीन सरकारने नवीन सीमा कायदा लागू करण्याच्या दोन दिवस अगोदर आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशातील 15 ठिकाणांचे नामांतर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर भारत सरकारने गुरुवारी म्हटले होते की, सीमावर्ती राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहील आणि नवी नावं दिल्यानं वस्तुस्थिती बदलत नाही.
दरम्यान, प्रसारमाध्यमांकडे आलेल्या फोटोत भारतीय सैनिक गलवान खोऱयात ध्वज फडकवताना दिसत आहेत. त्यांच्याकडे नुकत्याच सैन्यात सामील केलेल्या नवीन सिग सॉर रायफल दिसत आहेत.