ऑनलाईन टीम/तरुण भारत
गलवान खोऱ्यात झालेल्या चिन आणि भारतीय सैनिकांमध्ये 2020 मधील चकमकीबाबत एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने मोठा खुलासा केला आहे. या खुलास्यातून चीनचा खुलासा झाला आहे. या गलवान खोऱ्यातील चकमकीमध्ये चीनने केलेल्या दाव्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे या अहवालात समोर आले आहे. खोऱ्यातील गलवान नदी ओलांडताना ३८ चिनी सैनिक नदीतच बुडाले त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असून, चीनचे मोठे नुकसान झाल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र ‘द क्लॅक्सन’ने चीनमधील अज्ञात संशोधक आणि ब्लॉगर्सचा हवाला दिला आहे.