प्रतिनिधी / सातारा
शहरातील शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणी वितरण होणाऱया जलवाहिनीला बोगदा येथे गळती लागलेली आहे. त्यामुळे शहराच्या काही भागाला पाणी पुरवठा दि.1 रोजी होणार नाही. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांनी केलेले आहे.
शहापूर योजनेच्या 450 मि.मी. व्यासाच्या वितरण नलिकेला मोठय़ा प्रमाणात बोगदा येथे चौगुले यांच्या घरासमोर गळती लागली आहे. ही गळती काढण्याचे काम पालिकेने दि.313 रोजी युद्ध पातळीवर हाती घेतले आहे. पाईपलाईनला गळती काढण्याचे काम जिकरीचे व अवघड असल्याने त्याचा परिणाम म्हणून पाणी उपसा केंद्र बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे शहरातील पाण्याच्या वितरण टाक्यांना पाण्याची लेव्हल मिळणार नाही. त्यामुळे मंगळवार दि.1 जुन 2021 रोजी पाणी पुरवठा होणार नाही. बुधवार दि. 2 रोजी पाणी पुरवठा कमी जास्त होईल. मंगळवार दि. 1 रोजी सकाळच्या सत्रातील शहापूर उदभव योजनेतून पाणी पुरवठा होणाऱया गुरुवार टाकी, गणेश टाकी, यशवंत टाकी, घोरपडे टाकी, राजवाडा टाकी, बुधवार नाका टाकी या टाक्यांद्वारे वितरीत होणाऱया भागातील सर्व नागरिकांना कळवण्यात येते की पाईपलाईनच्या दुरस्तीचे काम करण्यासाठी सकाळच्या सत्रातील पाणी पुरवठा होवू शकणार नाही. बुधवार दि. 2 रोजी पाणी पुरवठा कमीजास्त प्रमाणात होईल. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांनी केलेले आहे.