प्रतिनिधी/ बेळगाव
पाण्यासाठी वनवन भटकावे वागते. गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील काही भागांमध्ये 8 ते 15 दिवस पाणीच आले नव्हते. त्यामुळे मोठय़ा समस्येला तोंड द्यावे लागले होते. मात्र गांधीनगर येथील संकम हॉटेल जवळ पाईप फुटून शेकडो लीटर वाया जात होते. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. याची माहिती पाणी पुरवठा मंडळाला देण्यात आल्यानंतर दुपारी त्या पाईपची दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
गांधीनगरजवळ असलेल्या पेट्रोल पंपाला लागूनच हे पाणी रस्त्यावरुन वाहत होते. पाण्याचा लोंढा मोठा असल्यामुळे त्यामधून वाहने जाताना ते पाणी शिथडत होते तर त्यामधून वाढ काढतानाही अनेकांना मोठा त्रास होत होता. पहाटेपासूनचहे पाणी वाया जात होते. रहदारीच्या ठिकाणी ही गळती लागली होती. त्यामुळे वाहनांना या पाण्यामधूनच पुढे न्यावे लागत होते. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या घटनेची माहिती पाणी पुरवठा मंडळाला दिल्यानंतर काही वेळाने त्याची दुरुस्ती करण्यासाठी कामकाज सुरू करण्यात आले होते.