ऑनलाईन टीम/तरुण भारत
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची रविवारी आत्मपरिक्षण बैठक झाली. तसेच काँग्रेच्या G २३ नेत्यांचीही बैठक झाली होती. याबैठकीत गांधी घराण्याने नेतृत्व सुडून इतरांना संधी दिली पाहिजे असा सूर होता. हा सूर काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर ऐकायला मिळला. गांधी कुटुंबाने काँग्रेसचं नेतृत्व सोडावं असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी म्हटल आहे.
दरम्यान, काँग्रेस कार्यकारी समिती बैठकीच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सोमवारी गांधी कुटुंबाबद्दल महत्वाचं वक्तव्य केलं आहे. गांधी कुटुंबाने काँग्रेसच्या नेतृत्वापासून बाजूला व्हावं आणि इतर एखाद्या व्यक्तीला संधी द्यावी असं रोकठोक मत सिब्बल यांनी व्यक्त केलंय. या बैठकीत मुकुल वासनिक यांना अध्यक्ष करावं असा नेत्यांनी जोर लावला आहे. मुकुल वासनिक हे काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी आहेत.
पक्षाने आयोजित केलेल्या विचारमंथनाच्या कार्यक्रमासंदर्भातही सिब्बल यांनी थेट नाराजी व्यक्त केलीय. पक्षाचं नेतृत्व हे फार संकुचित विचार करत असून त्यांना मागील आठ वर्षांमध्ये पक्षाची पडझड का होतेय याची कारण ठाऊक नसल्याचा टोला सिब्बल यांनी लगावलाय.