रत्नागिरीनजीकच्या निवळी फाटा येथील घटना
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीतील मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी फाटा येथे एका गादीविक्रीच्या दुकानात आगीचा भडका उडाला. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
निवळी तिठा येथील बाजारपेठेत सलीम गादीवाला या दुकानात ही आग लागली होती. या बाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या कारखान्याला आग लागल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र गादी कारखान्यातील गाद्या व इतर साहित्य खाक झाले आहे. या आगीचे कारण समजू शकलेले नाही. मात्र वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने आजूबाजूच्या दुकानांना कोणतीही झळ पोहोचली नाही.