अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश
अलाहाबाद / वृत्तसंस्था
हिंदूंसाठी पवित्र असणाऱया गाईला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात यावे आणि तिच्या हत्येवर बंदी घालण्यात यावी, असा आदेश उत्तर प्रदेशातील अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. गायीची चोरी करणे, हत्या करणे हे गंभीर गुन्हे मानले गेले पाहिजेत, असेही निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
एका व्यक्तीने गाईची चोरी करुन खाण्यासाठी तिची हत्या केल्याचे प्रकरण उच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी होते. त्याचा निर्णय देताना न्या. शेखर यादव यांनी गोरक्षणासाठी अनेक उपाय सुचविले आहेत. गाय हे हिंदू संस्कृतीचे प्रतीक आहे. तसेच गायीचे आणि गोवंशाचे अनेक आर्थिक लाभही आहेत. गोवंशाचे संरक्षण होणे हे देशाच्या हितासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे गाईंच्या हत्येवर सर्वंकष बंदी घालण्यात आली पाहिजे, असे मतप्रदर्शनही निर्णयात करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश सरकारने चार वर्षांपूर्वीच गोहत्या बंदी कायदा केला आहे. या कायद्याचे काटेकोर क्रियान्वयन होणे आवश्यक आहे. गाईंच्या संवर्धनासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावेत. गरीबांच्यग्ना जीवनात गाईचे महत्व मोठे असून गोवंश हा भारताच्यग्ना कृषी क्षेत्रासाठी आजही आवश्यक आहे. त्यामुळे गोहत्येसारख्या प्रकरणांमध्ये गंभीरपणे कारवाई झाली पाहिजे. गोवंश संवर्धनाकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशा अनेक सूचना निर्णयपत्रात करण्यात आल्या आहेत.