जिह्यातील 1495 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत
प्रतिनिधी/ सातारा
गावचे कारभारी ठरवणारा आजचा दिवस जिल्हय़ातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पार पडला. त्या त्या तहसीलदारांच्या हस्ते जिह्यातील अकरा ठिकाणी चिठ्ठीवर गावचे कारभारी कोण असेल हे ठरवण्यात आले. ज्यांच्या निवडणुका नव्हत्या त्यांच्याही सोडती झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून तेथील गावपुढाऱयांचे डावपेच सुरु झाले आहेत. तर आरक्षण सोडत पहाण्यासाठी फक्त निवडणूक झालेल्या गावचेच कार्यकर्ते हजर होते. जिह्यातील 1495 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत झाली. काही गावांमधील कार्यकर्त्यांची निराशा झाली तर काही गावांमध्ये आरक्षणामुळे उत्साह दिसत होता.
दरवेळेप्रमाणे सरपंच आरक्षण हे निवडणुकीअगोदर नसल्यामुळे गावपुढाऱयांना व्यूहरचना आखताना अवघड झाले होते. तरीही कोणतेही आरक्षण पडो, त्या प्रवर्गाचा आपला सदस्य असावा यासाठी गावपुढारी आग्रही होते. पण निवडणुकीनंतर काही जणांना सदस्य निवडून आणताना शक्य झाले तर काही जण आरक्षण काय पडतेय यावर बघू म्हणून आशावादी बनले होते. शुक्रवारी झालेल्या आरक्षण सोडतीनंतर काही जणांना इच्छुप्रमाणे आरक्षण मिळाले तर अनेकांची मात्र वाट लागली. जास्त सदस्य मिळूनही आरक्षणामुळे सरपंचपद दुसऱया पार्टीला जात असल्यामुळे पश्चाताप झाला आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 2025 पर्यंत ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे अशा सर्वच जिह्यातील 1495 ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत चिट्ठीद्वारे आज पार पडली. सातारा, पाटण, कराड, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, वाई, जावली, महाबळेश्वर अशा अकरा तालुक्यामध्ये आरक्षण सोडतीला त्या त्या तालुक्यीतल तहसीलदारांनी स्वतः हजेरी लावली होती. गावचे आरक्षण काय पडेल यासाठी गाव पुढाऱयांनी उत्सुकता म्हणून उपस्थिती लावली होती. चिठ्ठीद्वारे आरक्षण सोडत पार पडतेवेळी सर्व यंत्रणा तहसील कार्यालयाच्यावतीने करण्यात आली होती. ज्यांची अपेक्षा होती. त्याच्या उलटच आरक्षण पडल्याने काहीजण सरपंचकीचे स्वप्न पहाणारे निराश होवून परताना दिसत होते. तर काहींच्या चेहऱयावर उत्साहाचे वातावरण दिसत होते. पॅनेल निवडून आले असले तरीही सरपंचकीचा घोळ आरक्षणामुळे केल्याने काहींच्या चेहऱयावर निरुत्साह दिसत होता. जिह्यातील 1495 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडल्यामुळे काहींना आश्चर्य व्यक्त होते.