खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार
खानापूर / प्रतिनिधी
ग्राम पंचायती या ग्रामीण भागाच्या परिवर्तनाचा मुख्य आधार आहेत. सुविधांची पूर्तता आणि भौतिक विकास एवढीच ग्रामपंचायत सदस्यांची जबाबदारी नसून गावच्या सामाजिक, सामूहिक आणि सार्वजनिक प्रगतीची धुरा स्थानिक लोकप्रतिनिधीनी वाहिली पाहिजे. स्वच्छ, सुंदर स्वावलंबी आणि संपन्न गावच्या निर्मितीसाठी सदस्यांनी कल्पकता व नवोपक्रमशीलता अंगी बाळगणे आवश्यक असल्याचे मत सत्कार सोहळय़ाचे प्रमुख वक्ते वासुदेव चौगुले यांनी व्यक्त केले.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने येथील लोकमान्य सभागृहात तालुक्मयातील नवनिर्वाचित मराठी भाषिक ग्रामपंचायत सदस्यांचा हृद्य सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे अध्यक्ष व माजी आमदार दिगंबर पाटील होते. व्यासपीठावर सीमा सत्याग्रही नारायण लाड, नारायण पाटील, माजी अध्यक्ष विलास बेळगावकर, सरचिटणीस आबासाहेब दळवी, जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, नारायण कार्वेकर, मराठी सांस्कृतिक प्रति÷ानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, माजी नगरसेवक अनिल पाटील, शहराध्यक्ष विवेक गिरी, महादेव घाडी, प्रकाश चव्हाण, वसंत नावलकर, अमृत पाटील, दीपक देसाई, विठ्ठल गुरव, कृषी पत्तीन संचालक शंकर पाटील आदी उपस्थित होते.
चौगुले पुढे म्हणाले, खेडी स्वावलंबी आणि सक्षम झाली पाहिजेत. तुम्हाला मतदान केलेल्या नागरिकाला तुमच्या पाच वर्षाच्या कामगिरीनंतर समाधप्न वाटले नाही तरी चालेल पण मतदान केल्याचा पश्चाताप होता कामा नये. लोकांना आपण कर रूपाने दिलेला पैसा सत्कारणी लागत आहे याची शाश्वती पटल्यास कोणीही कर चुकवेगिरी करणार नाही. पंचायतीचे प्रशासन लोकाभिमुख बनविल्यास लोकांची विश्वासार्हता वाढीला लागून कोणत्याही समस्येवर एकजुटीने मात करता येते असे सांगितले.
यावेळी बोलताना बरगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य पद्मश्री पाटील म्हणाल्या, गावातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी आगामी पाच वर्षे प्रामाणिकपणे सेवा करावी. गटातटाचे राजकारण बाजूला सारून गावचा विकास आणि समृƒाr यासाठी आपले कौशल्य व अनुभव पणाला लावावा. अनुभवी व ज्ये÷ नागरिकांच्या सूचनांच्ाा आदर करण्याचे आवाहन केले.
स्वागत व प्रास्ताविक भाषणात कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी विकासाबरोबरच समितीच्या ध्येयधोरणांशी प्रामाणिक राहून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी हाती घेण्यात येणाऱया प्रत्येक आंदोलनात लोकप्रतिनिधी या नात्याने जातीनिशी सहभाग घेण्याचे आवाहन नूतन सदस्यांना केले.
याप्रसंगी तालुक्मयातील सर्व मराठी भाषिक ग्राम पंचायतीच्या सदस्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावून सत्कार स्वीकारला. त्यामध्ये कणकुंबी, पारवाड, गोल्याळी, बैलूर, जांबोटी, निलावडे, रामगुरवाडी, निट्टुर, इदलहोंड, हलकर्णी, बरगाव, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, लोकोळी, चापगाव, हेब्बाळ, करंबळ, शिंदोळी, गुंजी, शिरोली, नेरसा, हलगा, नागरगाळी, मोहीशेत, घोटगाळी, बिजगर्णी, क. नंदगड, बेकवाड, कापोली, हलशी आदी ग्राम पंचायत सदस्यांचा समावेश होता.
प्रारंभी शहर अध्यक्ष विवेक गिरी यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमाला एम. पी. पाटील, बी बी. पाटील, व्ही. एन. पाटील, रुक्माण्णा झुंजवाडकर, मऱयाप्पा पाटील, शंकर गावडा, भैरव कुंभार यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.