माजीक-हळीद गटाचा आरोप
प्रतिनिधी / वाळपई
केरी सत्तरी सातेरी केळबाय आजोबा देवस्थानात माजिक समाज दादागिरी करून सर्व हक्क आपल्या बाजूने घेत असल्याच्या आरोपाचा माजीक गटाने पूर्णपणे खंडन केले आहे .गावस —गावकर यांनी केलेले आरोप म्हणजे बिनबुडाचे असून किंबहुना त्यांच्याकडून मोठय़ाप्रमाणात दहशत माजविण्याचे काम सुरू असून त्यांनी आपल्या खाजगी देवस्थानांमध्ये सर्व प्रकारचे सण साजरे करून केरी भागातील प्रमुख देवस्थान श्री. सातेरी केळबाई आजोबा हे देवस्थान बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप माजी गटातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आलेला आहे .
गावस व गावकर या समाजाने आतापर्यंत देवस्थानाच्या प्रत्येक क्षण व कार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केलेला आहे .अनेक मुद्यावर अनेक प्रकारची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असून यामुळेच देवस्थानाची बदनामी त्यांच्यामुळे झाल्याचा आरोप माजीक गटाने केलेला आहे.
यासंदर्भाची माहिती अशी की 27 रोजी आयोजित करण्यात आलेल्या देवस्थानच्या पारंपरिक कालोत्सव यावेळी मोठय़ा प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सदर उत्सव देवस्थानच्या प्रशासक संजीवनी सातार्डेकर यांना स्थगित करावा लागला. या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन गावस गावकर यांनी माजीक गटावर आरोप करून हा सण स्थगित करण्यासाठी जबाबदार असल्याचे म्हटले होते. त्याचप्रमाणे माजी गट हा देवस्थानात दादागिरी करून सण बंद करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज माजिक महाजन गटातर्फे पत्रकार परिषद आयोजित करून या रोगाचे पूर्णपणे खंडन केले. गावस व गावकर समाजाचे वेगळे देवस्थान आहे. या देवस्थानात सर्व प्रकारचे सण साजरे करण्यात येत आहेत. मात्र या प्रमुख देवस्थानात मात्र सण साजरे करताना त्यांच्याकडून विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे हे प्रमुख देवस्थान बंद करून आपले देवस्थान चांगल्या प्रकारे सुरू रहावे अशा प्रकारचा डाव त्यांच्याकडून रचला जात असल्याचा आरोप यावेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.
प्रमुख देवस्थान बंद करण्याचा डाव क्रिष्णा माजीक
या देवस्थान यासंदर्भात सविस्तरपणे माहिती देताना कृष्णा माजीक गट या देवस्थानाची अत्यंत जुने संबंध आहेत. गावस गावकर हे ठिकाणी झालेले आहेत. यामुळे त्यांचा देवस्थानच्या स्थापनेची कोणताही संबंध नाही. तरीसुद्धा बहुसंख्य बळावर देवस्थानच्या प्रक्रियेमध्ये मनमानी व आधुनिक कारभार करून देवस्थान आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न गावस व गावकर गटाकडून करण्यात येत असल्याचा आरोप कृष्ण माजीक यांनी केला. 27 रोजी कालोत्सव साजरा करण्यावर निर्माण झालेला गोंधळ हा पूर्णपणे गावस गागावकर यांच्यामुळेच झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गावस गावकर गट हे इतर समाजाचे अस्तित्व नसल्याचे सिद्ध करू पाहत आहे. यामुळे वेगवेगळय़ा माध्यमातून न्यायालयात प्रकरणे नेऊन देवस्थानाची बदनामी करण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
सुतक असताना धार्मिक प्रक्रियेत भाग घेतला नाही.
27 रोजी देवस्थानाचे धार्मिक उपक्रम पार पडण्यास संदर्भात माजिक महाजन गट स्वतः होते. यामुळे त्यांनी या देवस्थानाचे धार्मिक प्रक्रियेमध्ये गावस गावकर यांनी केला होता. त्याचे यावेळी खंडन करण्यात आले .आम्ही सदर ठिकाणी उपस्थित होतो .मात्र देवस्थानच्या धार्मिक प्रक्रियेमध्ये भाग घेतला नाही. कालोत्सव साजरा करण्यासाठी देवस्थाने असलेला कळस बाहेर नेणे गरजेचे असते .मात्र हा कळस माजिक महाजनांनी उचलून गावकर गटाकडे देण्याची अनेक वर्षाची परंपरा रूढ आहे. मात्र सदर दिन माजिक महाजनांना सुतक असल्यामुळे त्यांना कळसाला हात लावता येत नव्हता. यामुळे ही जबाबदारी माजी गटाचे सहकारी हळीद गटाला देण्यात आली होती. मात्र त्याला ग्रामस्थ व गावकर यांनी तीव्र स्वरूपाचा विरोध केला. असे कृष्णा माजीक यांनी यावेळी स्पष्ट केले. जोपर्यंत देवस्थानातील कळस बाहेर जात नाही. तोपर्यंत कालोत्सव साजरा करण्याची परंपरा असल्यामुळे सदर दिनी कालोस्तव साजरा करण्यात आलेला नाही. मात्र माजीक गटांच्या आडमुठय़ा धोरणामुळे स्थगित झाल्याचा आरोप गावस गावकर यांच्याकडून करण्यात आला होता तो निव्वळ खोटा असल्याचे यावेळी ते म्हणाले.
सोन्याची चोरी आमचा संबंध नाही.
गावस -गावकय समाजाने देवस्थानच्या सोन्याची चोरी झाल्याचा आरोप करण्यात आला होता .त्या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता त्यांच्याशी आमचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. माजिक महाजन हे देवस्थानचे सेवेकरी आहेत. देवस्थानच्या सर्व वस्तूंची जबाबदारी घेण्यासाठी कार्यकारी समिती आहे. यामुळे यदाकदाचित सोन्याची चोरी झाली असेल तर ती कार्यकारी समितीची जबाबदारी आहे .यासंदर्भात गावात गावकार समाजाने पोलीस स्थानकावर तक्रार दिलेली आहे. त्या संदर्भात चौकशी करून त्यासंदर्भात कार्यकारी समिती याबाबत जास्त प्रकाश टाकू शकेल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
गावस-गावकर गटाची दादागिरी सिमेपलिकडे-चंद्रकांत गावस
गवस व गावकर समाजाने अनेक वेळा दादागिरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 27 रोजी मोठय़ा संख्येने देवस्थानच्या गर्भकुडीत घुसून सदर समाजाच्या नागरिकांनी दादागिरी करून मोठय़ा प्रमाणात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सदर ठिकाणी उपस्थित झालेल्या पोलीस यंत्रणेला हा गोंधळ नियंत्रणात आणण्यास अपयश आल्याचा आरोप चंद्रकांत गावस यांनी यावेळी केला. माजीक गटाला सुतक असल्यामुळे ही जबाबदारी हळीद गटाने पार पाडावी अशा प्रकारची विनंती करण्यात आल्यानंतर सुद्धा गावकर समाजाने याला विरोध दर्शविला. यामुळेच सदर दिवशी साजरा करण्यात येणारा पारंपारिक उत्सव रद्द करावा लागला असे गावस यांनी यावेळी स्पष्ट केले.
अशी गोंधळाची परिस्थिती बरोबर नाही–महादेव गावस
85 वषीय महादेव गावस यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना अशा प्रकारची गोंधळाची परिस्थिती एका पवित्र व जागृत देवस्थानाच्या परिसरांमध्ये होणे अजिबात बरोबर नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. गावस व गावकर समाज ज्या पद्धतीने या देवस्थानांमध्ये धुडगुस घालण्याचा प्रयत्न करीत आहे ते खरोखरच दुर्दैवी स्वरूपाची आहे. यामुळे देवस्थानाची मोठय़ा प्रमाणात बदनामी होत आहे .असे यावेळी ते म्हणाले. गेल्या शेकडो वर्षापासून देवस्थानच्या कालोस्तवेळी नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. उपार दाखवण्याची परंपरा नाही. तरीसुद्धा या गावास व गावकर समाजातर्फे या दिनी उपार दाखविण्याची करण्यात आलेली प्रक्रिया खरोखरच परंपरेला बाधक निर्माण करणारी आहे.
तर गावस-गावकर यांनी वरीष्टांशी दाद मागावी–राजाराम म्हालकर
गावस व गावकर गटाने देवस्थानच्या प्रशासन तथा संयुक्त मामलेदार संजीवनी सातार्डेकर या देवस्थानांमध्ये मनमानी कारभार करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केलेला आहे. याला राजाराम यांनी पूर्णपणे आक्षेप घेतला. आतापर्यंत संजीवनी सातार्डेकर यांच्याकडून न्याय व कायद्याला अनुसरुनच कार्य केलेले आहे. जर त्यांना संजीवनी सातार्डेकर या देवस्थानांमध्ये अन्यायकारक कारभार करीत असल्याचे वाटत असेल त्यांनी निश्चितप्रमाणात त्यांच्या उच्चधिकाऱयांकडे दाद मागणे उचित ठरणार आहे. मात्र त्यांच्यावर सडेतोड आरोप करून त्यांची बदनामी करण्याचे कृत्य बरोबर नाही असे राजाराम यांनी यावेळी स्पष्ट केले. आतापर्यंत गावस गावकऱ अनेक स्तरावर देवस्थानाच्या अनेक कार्यामध्ये विघ्न? आणून देवस्थानची पारंपारिक आख्यायिका याला बाधा आणण्याचे काम केलेले आहे .अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला.