रेल्वे सेवा देण्याची जिल्हाधिकाऱयांकडे मागणी
प्रतिनिधी / पणजी
इतर वेगवेगळ्या राजातील गोव्यात कामाला असलेल्या मजूर वर्गांनी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांच्या कार्यालयासमोर जमाव केला. आपापल्या गावी (राज्यात) जायचे असल्याने त्यासाठी सरकारने रेल्वेची, बसची सोय करावी आणि राज्यात पाठवून द्यावे अशी मागणी त्यांनी केली. रेल्वेची सोय झाल्यावर मजूरांना एसएमएसद्वारे आणि फ्ढाsन करुन वेळ व तारीख कळविली जाईल असे आश्वासन उपजिल्हाधिकारी विवेक एच. पी. यांनी यांनी दिले.
उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश, ओडिशा, गुजरात, मध्यप्रदेश व इतर ठिकाणी ज्यावेळी रेल्वे जाणार आहे त्यावेळी सर्वांना कळविण्यात येईल. एका रेल्वेत 1200 प्रवासीच जाऊ शकतात त्यामुळे सर्वांना एकत्र पाठविणे शक्य होणार नाही हे सर्वांनी समजून घ्यावे. रेल्वेत जागा नसेल तर जसे आपण वेटींग लिस्टवर राहतो तसाच हाही प्रकार आहे. त्यामुळे कुणीही विचलित होऊ नये असे आवाहनही त्यांनी केली.
यावेळी काही मजूरांनी बसची सोय करावी अशी मागणी उपजिल्हाधिकाऱयांकडे केली. यावर त्यांनी सांगितले की तुम्ही खाजगी बस करुन जाऊ शता परंतु त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. आम्ही परवानगी दिली तरीही इतर राज्यातून तुम्हाला जावे लागणार आणि त्यांचीही परवागनी आवश्यक आहे. तुम्ही खाजगी गाडी करत असाल आणि सर्व नियम पाळणार असाल तर इतर राज्यातून मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करु असेही ते म्हणाले.