1 हजार किलो मासे, 250 किलो मिठाई, 50 कोंबडय़ा, 10 बकरे
आषाढ मास हा तेलगू परंपरेनुसार पवित्र मास आहे. तेलगू परंपरेनुसार नवविवाहित मुलीला तिच्या घरच्यांकडून भेटवस्तू दिल्या जातात. आईवडिल स्वतःच्या मुलीला मिठाई आणि अन्य सामग्रीसह भेटवस्तू आणि साडी पाठवतात. आंध्रप्रदेशात नवविवाहित मुलीला पित्याकडून पाठविण्यात आलेले ‘गिफ्ट’ शहरात चचेचा विषय ठरले आहे.
राजमुंद्रीच्या एका व्यावसायिकाने स्वतःच्या मुलीच्या घरी 1 हजार किलो मासे, 1 हजार किलो भाज्या, 250 किलो झिंगा, 250 किलो धान्य, लोणच्यांचे 250 जार, 250 किलो मिठाई, 50 कोंबडय़ा, 10 बकरे पाठविले आहेत. मुलीचा विवाह पुड्डुचेरीच्या यनममध्ये झाला आहे. वडिलांनी स्वतःच्या मुलीला ही मोठी भेट ‘साडी’च्या नावाने पाठविली आहे.
यनमच्या प्रमुख व्यावसायिकाचा मुलगा पवन कुमारचा अलिकडेच राजमुंद्रीच्या बतूला बलराम कृष्ण यांची कन्या प्रत्युषासोबत विवाह झाला होता. विवाहानंतरचा पहिला आषाढ महिन्याचा उत्सव हे दांपत्य साजरा करत असताना वधूच्या वडिलांनी याला भव्य स्वरुप देण्याचा निर्णय घेतला. प्रत्युषाच्या सासरी ट्रकमध्ये भरलेल्या गिफ्ट पोहोचल्यावर तेथील लोकही अवाप् झाले.
या गिफ्ट्सची चर्चा आता पूर्ण शहरात होत आहे. मुलीच्या सासरी जल्लोषाचे वातावरण असून मेजवानीची तयारी सुरू आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक तेलगू कुटुंबात स्वतःच्या पात्रतेनुसार आषाढ महिन्यात मुलीच्या सासरी भेटवस्तू पाठविल्या जातात.