25 लाख अर्थसहाय्य अन्यथा घरातील एकास नोकरी
बांदा/प्रतिनिधी-
गाळेल येथे डोंगर खचल्याने वेंगुर्ले मठ येथील गीतेश गोपाळ गावडे हा गोव्यात नोकरीसाठी जाणार युवक ढिगाऱ्याखाली अडकून मयत झाला. गीतेश हा घरातील कमवता तरुण असल्याने त्याच्या मृत्यूची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारून त्याच्या कुटुंबियांना रोख 25 लाख रुपयाचे अर्थसहाय्य द्यावे अन्यथा त्याच्या घरातील एका व्यक्तीस शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरीत सामावून घेणे अशी लेखी मागणी बांदा सरपंच अक्रम खान यांनी सावंतवाडी तहसीलदार यांचेकडे केली आहे.
यावेळी सावंतवाडी उपसभापती शीतल राऊळ, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, बांदा सरपंच अक्रम खान, मळेवाड सरपंच हेमंत मराठे, सुनील धमपुरकर, पप्पू कदम, बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी आदी उपस्थित होते.
या निवेदनात त्यांनी म्हटले कि, शुक्रवारी 23 रोजी बांदा डिंगणे रस्त्यावर डोंगर खचून झालेल्या दुर्घटनेत गीतेश गावडे या युवकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला.महाराष्ट्र गोवा सीमेवर गोव्यात रोजगार साठी जाणाऱ्या युवकांची अडवणूक होत असल्याने गीतेश गाळेल मार्गे गोवा जात होता.गीतेशच्या मृत्यूला पूर्णपणे प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे.गीतेशचा मृत्यू झाल्याने गावडे कुटुंबीयांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.त्यामुळे शासनाने त्याच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून रोख 25 लाख अर्थसहाय्य अन्यथा कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी लेखी निवेदनातून केली आहे.