व्यापारी वर्ग-ग्राहकांचा प्रतिसाद- ग्रामस्थांसह व्यापारी वर्गात आनंद
गुंजी वार्ताहर
एकेकाळी ब्रिटिश राजवटीत एक उत्तम बाजारपेठ म्हणून नावारुपास आलेली आणि अद्यापही तत्कालीन नकाशात मुंबई इलाख्यामध्ये गुंजी पेठ म्हणून नमूद असलेली गुंजी बाजारपेठ पुन्हा एकदा गजबजू लागली आहे. शुक्रवारी गुंजी गावातील प्रति÷ित नागरिक, पंचमंडळी आणि ग्रामपंचायतीच्यावतीने आठवडी बाजाराचे उद्घाटन करून आठवडी बाजारास सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित असलेले गुंजीतील ज्ये÷ पंच राजाराम देसाई यांनी सांगितले की, गेली चार वर्षे आठवडी बाजार भरावा अशी आपली इच्छा होती. जेणेकरून गुंजी पंचक्रोशीतील अनेक शेतकऱयांचे विविध उत्पादनाची या बाजारपेठेमध्ये विक्री व्हावी. त्याचबरोबर येथील लोकांना जवळची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि नागरिकांनाही ताजी भाजी तसेच जीवनोपयोगी सर्व साहित्य मिळण्यास सुकर व्हावे या हेतूने या आठवडी बाजारास सुरुवात करण्यात आली आहे.
गुंजी गाव हे जवळजवळ 24 खेडय़ांचे केंद्रस्थान असून राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे. या गावांमध्ये तहसीलदार केंद्र, ग्रामपंचायत, पशु चिकित्सालय, कृषी केंद्र, कर्नाटक विकास ग्रामीण बँक, अनेक बँक-सोसायटय़ा, सुवर्णपेढय़ा, किराणा दुकाने, सरकारमान्य रेशन दुकान, चिकन, मटण, मासे, तसेच अनेक कपडय़ांची दुकाने, सिमेंट, हार्डवेअर, इलेक्ट्रीकल, हॉटेल्स अशी विविध सुविधा उपलब्ध आहे. मात्र केवळ आठवडी बाजाराचा अभाव होता आणि तोही आता सुरू झाल्याने गुंजीसह परिसरातील नागरिकांतून उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
शुक्रवारी या बाजारामध्ये विविध प्रकारच्या भाज्या, कडधान्य, मसाल्याचे पदार्थ, फळे, बेकरीतील काही खाद्यपदार्थ अशा विविध प्रकारचे व्यापारी आले होते. अत्यंत माफक दरात सर्व भाजीपाला मिळाल्याने नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे या बाजारामध्ये पहिल्याच दिवशीच्या बाजारात भरपूर गर्दी पहावयास मिळाली. हा आठवडी बाजार आता दर शुक्रवारी भरणार आहे. हा बाजार भरविण्यासाठी गुंजीचे ज्ये÷ नागरिक राजाराम देसाई, सामाजिक कार्यकर्ते दीपक देसाई तसेच गुंजी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा व सदस्य यांनी परिश्रम घेतले.