गुंजी / वार्ताहर
गुंजी परिसरात गवी रेडय़ाकडून भात पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असून येथील शेतकऱयात चिंतेचे वातावरण पसरले आहे. संध्याकाळ होताच हे गवीरेडे शेतकऱयांच्या भात पिकांमध्ये शिरून भात खाऊन तुडवून नुकसान करीत असल्याचा सपाटाच चालविला आहे. या भागामध्ये जवळजवळ तीन-चार कळप असून दररोज वेगवेगळय़ा भागामध्ये शिरून भातपिकाचे नुकसान करणे हा त्यांचा दिनक्रम होत बनला आहे. त्यामुळे येथील शेतकऱयांच्या भात पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. भात उगवणीपासूनच त्यांचा वारंवार उपद्रव येथील शेतकऱयांना सहन करावा लागत आहे. मात्र सध्या भात कापणीस आलेले असताना त्याचबरोबर गेल्या पंधरा दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे येथील भात पिके जमीनदोस्त झाली आहेत. अशा पडलेल्या पिकांमध्ये हे गवीरेडे तुडवून, ताल मारून, खाऊन या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान करीत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेकोटय़ा बुजगावणे, बॅटऱया, फटाक्मया, कंदील अशा अनेक पारंपारिक गोष्टीबरोबरच आवाजाचे मोठमोठे भोंगे लावून देखील हे गवीरेडे शिवारात शिरत असल्याने येथील शेतकऱयांचे काहीच चालेनासे झाले आहे. त्यामुळे येथील शेतकऱयामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
नाम मात्र नुकसानभरपाई
अरण्य खात्याच्यावतीने या भागातील नुकसानग्रस्त शेतकऱयाकडून अर्ज घेऊन पिकांचा पंचनामा करण्यात येत असला तरी अरण्य खात्याकडून अत्यंत तुटपुंजी नुकसानभरपाई देण्यात येत असल्याचे कांही शेतकऱयांनी सांगितले. तसेच काही शेतकऱयांनी नुकसानभरपाईसाठी अर्ज केले केले होते. मात्र अशा अनेक शेतकऱयांना दोन वर्षापासून नुकसानभरपाई मिळाली नसल्याची तक्रार अनेक शेतकऱयांनी केली आहे. याविषयी लोंढा वनविभागाच्या वनाधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी सर्वांना नुकसानभरपाई दिली असल्याचे सांगितले. मात्र काही शेतकऱयांची नुकसानभरपाई अद्याप मिळाली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर, त्यांची लवकरात लवकर नुकसानभरपाई त्यांच्या खात्यात जमा करणार असल्याचे सांगितले. तसेच यावषी कोरोनासारख्या महामारीमुळे निधीची कमतरता असल्याने शेतकऱयांना कमी प्रमाणात नुकसानभरपाई देण्याची नामुष्की ओढावली असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
बंदोबस्त करण्याची गरज
या भागात मोठय़ा प्रमाणात गवीरेडय़ांची संख्या वाढली असून अनेक कळप सध्या या भागात वावरत आहेत. शेतकऱयांकडून त्यांच्यावर कोणतीच धास्ती नसल्याने बिनधास्त, अनेकवेळा भरदिवसाही शिवारात ते शिरत आहेत. त्यामुळे त्यांची मोठी समस्या शेतकऱयांसमोर उभी आहे. उगवलेले भात पीक कापून मळणी करीपर्यंत वेळोवेळी यांचा सामना येथील शेतकऱयांना करावा लागत आहे. त्यामुळे येथील शेतकरी हतबल झाला आहे. तरी अरण्य खात्याने या गवीरेडय़ांचा त्वरित योग्यरितीने बंदोबस्त करून येथील शेतकऱयांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी होत आहे.