वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
कोविड19 च्या संसर्गामुळे विविध प्रकारच्या कामांमध्ये बदल होत असल्याचे दिसून येत आहे. महामारीच्या कारणामुळे भारतातील डिजिटल व्यवहारांना चालना मिळणार असल्याचा अंदाज इन्वेस्टमेंट बँक मॉर्गन स्टेनली यांनी मांडला आहे.
सामाजिक अंतर राखण्याच्या कारणामुळे आता जास्तीत जास्त लोकांचा ऑनलाईन खरेदीकडेच कल दिसतो आहे. याचा परिणाम म्हणून अलीकडे इंटरनेटचा वापर वाढलेला आहे. या बदलामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला हातभार लागणार आहे. यासाठी अनेक स्टार्टअप व अन्य कंपन्या काम करत आहेत.
किराणा व्यवसाय करणाऱयांमध्ये आगामी काळात ऑनलाईन बाजारपेठेचा वापर करणाऱयांमध्ये जवळपास 30 टक्के लोकांचा कल पहावयास मिळत आहे. हीच तुलना अन्य देशांमध्ये केल्यास ही वाढ चीन 78 टक्के आणि अमेरिका 70 टक्केपेक्षा अधिक राहणार असल्याची नोंद करण्यात आली आहे.
ऑनलाईन शॉपिंगची देशातील स्थिती
भारतामध्ये 67 कोटी इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 2027 पर्यंत वाढून 91.4 कोटींच्या घरात जाणार असून यातील ऑनलाईन खरेदी करणाऱयांची संख्या 19 कोटीने वधारुन 59 कोटींवर पोहोचणार आहे.
जिओ डिजिटल यंत्रणा बदलणार ?
रिलायन्स जिओची 4 जी नेटवर्क दूरसंचार सेवा सप्टेंबर 2016 पासून देशात सेवा सुरू झाल्यापासून अर्थव्यवस्थेचा कल डिजिटलकडे तेजी आणणारा आहे. ग्राहकांना 4 जी सेवा प्राप्त झाल्यामुळे अनेक प्रकारच्या सुविधा वापरण्याच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. ही बाब अर्थव्यवस्थेमधील डिजिटल प्रवास आणखीन मजबूत करण्यास मोठी मदत होणार असल्याचे मॉर्गन स्टेनलीनी सांगितले आहे.