ऑनलाईन टीम/तरुण भारत
गुजरातमधील गिर सोमनाथ येथे गेल्या रात्री सातत्याने सुरू असलेला पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे 13 ते 15 बोटी समुद्रात बुडाल्याची शक्यता आहे. या बोटीत काही मच्छीमाऱ्यांचाही समावेश असल्याचं बोललं होते. तसेच बोटीवरील 8 ते 10 मच्छीमार अद्यापही बेपत्ता आहेत. हवामान विभागाने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान, बुधवारपासूनच महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागात सतत्याने पाऊस सुरू आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने येत्या 48 तासांत येथे मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तविला होता. यासोबतच मच्छीमारांनाही 5 दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तरीही मच्छीमाऱ्यांच्या काही बोटी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. पण पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे काही बोटी बुडाल्या आहेत.