प्रतिनिधी / कागल
पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतकयांचे पर्यायाने कारखान्याचे ऊस उत्पादन वाढावे यासाठी शाहू प्रशासनाने नेहमीच नवनवीन प्रयोग केले आहेत. त्यातीलच पुढचे पाऊल म्हणून कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी गुजरात येथील नर्मदा खांड उद्योग सहकारी मंडळी लिमिटेड, गुजरात यांच्या सेंद्रीय शेती प्रकल्पास भेट दिली व सेंद्रिय शेतीची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत कारखान्याचे संचालक डी. एस. पाटील व कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रकल्पाबाबत माहिती देताना नर्मदा उद्योग चे चेअरमन घनश्यामभाई पटेल म्हणाले, मागील तीन वर्षापासून सेंद्रिय शेती (ऑरगॅनिक फार्मिंग)हा प्रयोग आम्ही हाती घेतला आहे, जवळपास दोनहजार एकरावर हा प्रयोग सुरु असून त्याला चांगले यश आले आहे. या प्रकल्पांतर्गत बऱयाच शेतकऱयांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देऊन त्यांचा कल सेंद्रिय शेतीकडे वाढवीन्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत. त्यासाठी शेतकऱयांच्या प्रत्यक्ष प्लॉटची पाहणी करून त्यांना संस्थेमार्फत सेंद्रिय खते व बी-बियाणे देऊन प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय त्यासाठी विशेष तज्ञाकडून आवश्यक ते मार्गदर्शन केले जाते .सेंद्रिय ऊस पिकानंतर सेंद्रिय गहू हरभरा व मूग आदी पिके घेण्यास शेतकऱयांना प्रोत्साहन दिले जाते. विशेष म्हणजे त्याची विक्री करण्यासाठी संस्थेमार्फत बाजारपेठ ही उपलब्ध करून दिली जाते तसेच सेंद्रिय खताची व सेंद्रिय मालाची सुलभ विक्री व्हावी यासाठी जवळपास चार ते पाच स्वतंत्र डेपो कार्यक्षेत्र उभारले गेले आहेत.
यावेळी नर्मदा खांडचे कार्यकारी संचालक नरेंद्र भाई पटेल त्यांचे सर्व खातेप्रमुख शाहू कारखाण्याचे सीडीओ के. बी. पाटील, चीफ केमिस्ट नितीनकुमार पाटील ,मार्केटिंग ऑफिसर मारुती पाटील, सल्लागार पराग गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, सेंद्रिय शेती ही भविष्याची मोठी गरज बनली असून शेतकऱयांच्या पर्यायाने कारखान्याच्या उत्पादन वाढीसाठी ही अत्यावश्यक बाब आहे. अलीकडे पिकावर होत असलेला रासायनिक खताचा बेसुमार मारा आणि जीवघेणी औषध फवारणी याचा विचार करता शेतकऱयाचे आरोग्य अधिकच धोक्यात आले आहे. त्यामुळे विषमुक्त शेता म्हणून या प्रकल्प कडे पाहणे अत्यावश्यक असून हा प्रयोग शाहू कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राबवण्याचा मानस आहे.