प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनचा निर्णय
प्रतिनिधी /बेळगाव
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी गुढीपाडव्याच्या सणासाठी विविध मार्गांवर जादा बस सोडण्यात येणार आहेत. गुढीपाडव्याला ये-जा करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असते. वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन परिवहनने हा निर्णय घेतला आहे.
मध्यवर्ती बसस्थानकाबरोबर शनिवारपासून मुंबई, पुणे, नाशिक, बळ्ळारी, धारवाड, हुबळी आदी मार्गांवर 30 हून अधिक अतिरिक्त बस धावणार आहेत. याबरोबर बेंगळूर, मंगळूर, हैद्राबाद, पणजी व इतर शहरांकडे विशेष बस पुरविल्या जाणार आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षात परिवहनला मोठा फटका बसला आहे. परिवहन झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. सुट्टी आणि सणासुदीच्या दिवसांत जादा बस पुरवून महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
जिल्हय़ातील अनेकजण कामानिमित्त मुंबई, पुणे, बेंगळूर, म्हैसूर, गोवा व इतर ठिकाणी आहेत. त्यामुळे गुढीपाडव्यानिमित्त मूळगावी परतणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असते. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन परिवहनने येत्या शनिवारपासून पुढील पाच दिवस जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीखातर ksrtc.karnataka.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन बुंिकंग सुरू आहे. तसेच बसस्थानकात आगाऊ बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.