अध्याय बाविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा, तसं बघितलं तर जीव हा ईश्वराचाच अंश असल्याने दोघांची ऐक्मयता सहज व स्वाभाविक आहे, यात शंकाच नाही. ज्याप्रमाणे आपण आपल्या मनाप्रमाणे हालचाल केली की, तशीच हालचाल आरशातील प्रतिबिंबही करते. ज्याप्रमाणे प्रतिबिंबाच्या हालचाली आपल्या मर्जीनुसार होत असतात, त्याप्रमाणे जिवाच्या हालचाली ईश्वराच्या मर्जीनुसार होत असतात. आरशात बघितल्यावर जसे आपले रूप असते तसेच प्रतिबिंबही दिसते, तसेच ईश्वराचे प्रतिबिंब असलेल्या जीवामध्येही परिपूर्ण ईश्वरपण भरलेले असते हे लक्षात घे. निखारा राखेने झांकलेला असला तरी त्यातील अग्नी आहे तसाच राहतो, त्याप्रमाणे शिवाला जरी जीवपणा आला तरी तो आत्मस्वरूपापासून निराळा होत नाही. उद्धवाने इथपर्यंतचे भगवंताचे निरूपण मन लावून ऐकून घेतले. ते ऐकून त्याच्या मनात अशी शंका आली की, जीव आणि शिव हे दोन्ही जर एक आहेत, तर एक मलिन व एक शुद्ध, एक सदोष, एक निर्दोष असा फरक का असतो? उद्धवाच्या शंकेचे उत्तर भगवंतांनी द्यायला सुरुवात केली. ते म्हणाले, असं बघ की एखाद्या डबक्मयामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडलेले असेल तर, त्या प्रतिबिंबाला डबक्मयातील सारी घाण लागलेली आहे असे वाटते पण तेच नीट न्याहाळून पाहिले, तर त्या बिंबाला किंवा प्रतिबिंबाला ती घाण मुळीच लागलेली नसते. ती दोन्ही निर्मळच असतात. आरशाच्या अंगावरच मळ बसलेला असेल, तर तोच प्रतिबिंबावरही चढलेला आहे असे वाटते. तो मळ काढून टाकायचा असेल, तर आरसाच स्वच्छ केला पाहिजे. प्रतिबिंब स्वच्छ करावे असे कुणी म्हणत नाहीत. यावरून आपण समजतो तसे शिव पवित्र आणि आत्मा मलिन असे होत नाही. त्यामुळे जीव सदोष व शिव निर्दोष असे समजणे ही केवळ अविद्याच होय.
जीव आणि शिव हे दोघेही सदासर्वदा आत्मस्वरूपाने निर्दोषच असतात. स्फटिक पाहिला तर तो स्वच्छच असतो पण ज्या रंगावर ठेवावा त्या रंगासारखा दिसू लागतो. तरी तो त्या रंगापासून वेगळा असतो, त्याप्रमाणेच जीव स्वभावतः अलिप्तच आहे, चित्स्वरूप आहे पण तो ज्या गुणाशी संलग्न होतो, त्यासारखा दिसतो पण गुणदोष किंवा पापपुण्य जीवाला मुळीच लागत नाही. शिवाच्या सामर्थ्यानेच त्याच्या प्रतिबिंबामध्ये गुणांचे मिथ्यत्व दिसते, त्याप्रमाणे जीवामध्ये व शिवामध्ये वेगळेपण निश्चित नाही. अशा प्रकारे जीवशिवांचे ऐक्मय मानले असता सव्वीस तत्त्वांतून एक तत्त्व कमी होऊन बाकी पंचवीसच राहतात. आता इथं एक अशी शंका येते की, अज्ञान दूर झाल्यामुळे, जीव आणि शिव एकच आहेत असे ज्ञान होते, हे लक्षात घेतले तर ते एक नवेच तत्त्व तयार होते आणि असे जर असेल तर, शिव आणि जीव वेगवेगळे आहेत असे सांगणारी पंचवीस व सव्वीस क्रमांकाची दोन्ही तत्त्वे व्यर्थ होतात का? तर तसे नाही कारण अज्ञानामुळे शिव आणि जीव हे वेगवेगळे आहेत असे समजून पंचवीस आणि सव्हीस ही दोन तत्त्वे तयार झाली पण जेव्हा अज्ञान दूर होते तेव्हा शुद्ध स्वरूपातील ज्ञान उरते म्हणजेच ज्ञान हे अज्ञानातूनच उत्पन्न होते आता जर अज्ञान त्रिगुणयुक्त आहे तर त्या अज्ञानातील सत्व गुण वाढुन रज, तम गुण कमी झाले की ज्ञानाचा उगम होतो.
म्हणजेच ज्ञानही सत्वगुणानेही का होईना गुणयुक्त असतेच! ज्ञान हे जर निर्गुण असते तर ते निराळे तत्त्व झाले असते, इतर सर्व तत्त्वे ही त्रिगुणयुक्तच आहेत म्हणून ज्ञान हे नवीन तत्त्व तयार होते किंवा पंचवीस व सव्हीस ही दोन्ही मते व्यर्थ होतात. हे खरे नसल्याने ती दोन्ही तत्त्वे ग्राह्य आहेत. उद्धवा! सत्त्व, रज, तम हे गुण निखालस अविद्यात्मक आहेत. तीन गुणांची साम्यावस्था हेच प्रकृतीचे स्वरूप आहे म्हणून सत्त्व, रज आणि तम हे गुण प्रकृतीचेच आहेत, आत्म्याचे नव्हेत. हेच जगाची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलय यांना कारण आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि नाश हे कार्य त्रिगुणांचे आहे. त्या तीन गुणांची जी साम्यावस्था ती प्रकृती होय. आत्मा हा निर्गुण म्हणजे गुणातीत आहे.
क्रमशः