गेल्या २० दिवसांत जनेतच्या संपर्कात – अज्ञातवासात गेल्याची केवळ अफवा
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा परिषदेतील एका महिला अधिकाऱ्याकडून ६ फेब्रुवारी रोजी शाहुपूरी पोलीस ठाण्यात माझ्यावर विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे . त्यानुसार ८ फेब्रुवारीला जिल्हा न्यायालयात हजर झालो. पण पोलीसांचे म्हणणे न्यायालयात सादर झाले नसल्यामुळे न्यायालयात हजर करून घेण्यास नकार दिला. सदरची तक्रार मॅट घोटाळा व इतर अर्थिक घोटाळ्यामध्ये कोणतीही तडजोड केली नसल्यामुळे दाखल केली असून हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांनी पत्रकार बैठकीत मंगळवारी दिली . भोजे म्हणाले, १ मार्चला स्वत : पोलीसात हजर राहून तपास कामात सहकार्य केले. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मला न्यायालयासमोर उभे केल्यानंतर सशर्त जामीन मंजूर केला आहे.
या तक्रारीनंतर जामीन मिळाल्याशिवाय जिल्हा परिषदेत जायचे नाही असे मी ठरवले होते . त्यामुळे मी अज्ञातवासात गेल्याची अफवा पसरली . पण गेले २० दिवस जिल्हा परिषदेत न येता मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात राहिलो . त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कार्यरत होतो . अनेक सार्वजनिक कामात सहभागी झालो . पण ६ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान पोलीस ठाण्यातून किंवा जिल्हा न्यायालयातून कोणतीही नोटीस मिळाली नाही . माझ्यावर दाखल झालेले ३५४ ए व ५० ९ हे दोन्ही गुन्हे जामीनपात्र असल्यामुळे मला अटक देखील झाली नाही . या कालावधीत मला जिल्हा परिषदेच्या आवारात येण्यासाठी न्यायालय अथवा पोलीसांनी मनाई केली नव्हती.
पण राजकीय नैतिकतेसाठी जिल्हा परिषदेत जायचे नाही असे मी ठरवले होते . माझा न्यायालयावर व पोलीसांवर विश्वास आहे . त्यामुळे आगामी काळात न्यायालय व पोलीसांकडे मोबाईलवरील अनेक पुराव्यांसह संबंधित कागदपत्रे सादर करून सहकार्य करणार आहे . त्यामुळे निश्चित न्याय मिळेल याची खात्री असल्याचे भोजे यांनी स्पष्ट केले . या तक्रारीमुळे खचून न जाता आगामी काळातही भ -ष्टाचाराविरोधात तितक्याच ताकदीने आवाज उठवणार असल्याचेही भोजे यांनी सांगितले .
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भ्रष्टचारमुक्त अभियान राबविणार जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार व अनियमितता याबाबत आमच्याकडे अनेक तव कारी येत आहेत . यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या भगसिंग , राजगुरु व सुखदेव यांच्या यांचा शहिद दिन असलेल्या २३ मार्चपासून लोकांच्या तक्रारी जिल्हा परिषदेत जमा करून घेतल्या जाणार आहेत . दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा उपक्रम राबविणार असल्याचे भोजे यांनी सांगितले .