‘सर्व जगाला व्यापून टाकणाऱया संकटाच्या यावेळी नकाराधिकार वापरणे आणि परस्पर वैरभाव मनात ठेवून वागणे या गोष्टींऐवजी एकोप्याने काम करून जगहिताचे निर्णय सुरक्षा परिषदेने घेतले पाहिजेत’ हे उद्गार आहेत युनोतील युरोपियन युनियनचे प्रतिनिधी जोसेप बोरेल यांचे. युरोपियन युनियनच्या परराष्ट्रव्यवहार आणि सुरक्षा धोरण या विषयांसाठी ते युनोमध्ये प्रतिनिधित्व सांभाळतात.
बोरेल यांचे उद्गार केवळ औपचारिक भाषणाचे नाहीत. चमत्कारिक अशा कोरोना विषाणूच्या जलदगती प्रसाराने संपूर्ण जगाला ‘न भूतो’ अशा अवस्थेतून जावे लागत आहे. ही स्थिती ‘न भविष्यति’ अशी असेल का या प्रश्नाचे उत्तर ‘आता तरी नाही’ असेच द्यावे लागेल. कारण एवढय़ा ताकदीने संसर्ग पसरविणारा विषाणू यापूर्वी कधी अवतरल्याचे माहितीत नाही, पण यापुढे तो किती काळ राहील, परत परत उद्भवेल का आणि हा किंवा असले आणखी कोणते विषाणू जन्माला येतील का ते सांगता येत नसल्याने ही परिस्थिती भविष्यात येणारच नाही असे नाही.
हे जगातील मोठमोठय़ा राष्ट्रांचे नेतृत्व करणाऱया बलाढय़ नेत्यांना समजत नसेल का? तरीही एकमेकांना दंड थोपटून आव्हाने देणे आणि परस्परांवर गुरकावत राहणे चालूच आहे. त्यामुळे बोरेल महाशयांचे उद्गार औपचारिक म्हणता येणार नाहीत. त्यांचे हे भाषण युनो आणि युरोपियन युनियन यांच्या परस्पर सहकार्याबद्दल झालेल्या एका चर्चेप्रसंगी केलेले आहे. 27 युरोपीय देशांचा त्यात सहभाग होता. बहुपक्षीय नवसंजीवनीयुक्त व्यवहार पद्धती आणण्यासाठी गरज या भाषणात त्यांनी बोलून दाखवली. याचा अर्थ सध्या अचेतन झालेल्या अर्थव्यवस्थेत पुन्हा जोम आणण्यासाठी जगातील सर्व राष्ट्रांनी परस्पर सहकार्याची साखळी गुंफली पाहिजे. बोरेल युरोपियन युनियनपुरते बोलले, पण त्यांचे प्रतिपादन जगाच्या विविध भागांतील राष्ट्रा-राष्ट्रांतील संबंधाना लागू पडते. त्यांना अभिप्रेत असलेल्या ‘नवसंजीवनीयुक्त व्यवहारा’साठी सर्वांचा सक्रिय सहभाग गरजेचा वाटतो. त्याची अपेक्षा करताना बोरेल यांनी स्पष्ट शब्दात बडय़ा राष्ट्रांच्या भूमिकेवर भाष्य केले. ‘सुरक्षा परिषदे’त बसणारे या परिस्थितीत काय करतात त्याकडे आमची नजर लागली आहे, असे म्हणून ‘कोविड-19’ जन्य परिस्थितीवर मात करायची असेल तर काही राष्ट्रांच्या प्रादेशिक समूहाचे प्रयत्न पुरेसे ठरणार नाहीत, तर जगाच्या प्रत्येक कोपऱयात या विषाणूला ठेचून काढले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.
युरोपियन युनियनमधल्या फक्त 27 देशांचे प्रतिनिधित्व करणारे बोरेल यांचे हे भाषण खरे तर संपूर्ण जागतिक समुदायाचे नेतृत्व सांभाळणाऱया व्यक्तीस शोभेलसे होते. आफ्रिका खंडाचा ‘बंधुखंड’ असा उल्लेख त्यांनी केला. आफ्रिकेतील साहेल या उत्तर वायव्य प्रभागातील परिस्थिती झपाटय़ाने बिघडत आहे आणि ती सुधारण्यासाठी युनो, युरोपियन युनियन, आफ्रिकन महासंघ आणि साहेलमधील पाच राष्ट्रांचा समुदाय यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज त्यांनी अधोरेखित केली.
नेमका हाच मुद्दा आज आशिया खंडाला लागू पडतो. भारत आणि चीन या दोन मोठय़ा सत्ता आशियाच्या मध्यवर्ती भागात आहेत. त्यांच्या संबंधातील व्यापारी ‘मैत्री’ आणि राजकीय, विशेषतः सीमाविषयक विवाद साऱया जगाला ठाऊक आहेत. गेल्या दहा दिवसात चीनने भारताच्या उत्तर सरहद्दीवरील हालचाली गतिमान केल्य़ा चीनची फूस असल्याने नेपाळसारखे सर्वस्वी भारतावर अवलंबून असणारे भूवेष्टित राष्ट्र भारतावरच गुरगुरु लागल़े ‘हमारी बिल्ली और हम से म्याव’ म्हणून हा मुद्दा झटकून टाकता येणार नाह़ी पश्चिमेस लडाख, पूर्वेस अरुणाचल आणि म्यानमारपर्यंत भारतीय सरहद्दीलगत चीनने सुसज्ज महामार्ग बांधले आहेत़ नेपाळला उर्वरित जगाशी संपर्क ठेवण्यास आता पूर्वीसारखे सर्वस्वी भारतावर अवलंबून रहावे लागत नाह़ी चीनने नेपाळला केव्हाच आपलेसे केले आह़े भारतातील राजकीय नेतृत्व त्या पर्वतमय राष्ट्राला धाकटा भाऊ समजून नेपाळकडे एकमेव हिंदुराष्ट्र या आदरभावनेने पहात राहिल़ा भारतातील राज्यकर्ते आणि समाज या दोघांनीही त्याकडे चीन आणि आपल्यातील ‘बफर राष्ट्र’ म्हणून पाहण्यात पुरेसे गांभीर्य दाखविले नाह़ी अशाप्रकारे चिमटीत सापडलेल्या आणि चारपैकी तीन बाजूंनी भारतभूमीने वेढलेल्या एका डोंगराळ देशांमध्ये अधिकाधिक पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात पुढाकार घेतला तो चीनने. आता भारत ‘कोरोना’च्या संकटात सापडल्याचे पाहून चीन उत्तर सीमेवर दंड थोपटू लागला आह़े
हाँगकाँग या लहानशा देशात चिनी वर्चस्ववादाविरुद्ध लढा सुरू आह़े हा लढा सर्वस्वी तेथील नागरिक देत आहेत़ विचित्र प्रकारे संसर्ग होणाऱया कोरोनाला थोपवायचे की चीनच्या राक्षसी वर्चस्वाला टक्कर द्यायची? या आशियाई क्षेत्रात पाकिस्तान हे असे राष्ट्र आहे की आपल्या नागरिकांना आजाराच्या साथीपासून वाचविण्यापेक्षाही त्याला भारताला दहशतवादी उपद्रव देणे महत्त्वाचे वाटत आह़े प्रादेशिक सहकार्यासाठी भारताच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सार्क या संघटनेतील पाकिस्तानचा सहभाग नावापुरता आणि कायम भारताविरोधी भूमिका घेणारा ठरल़ा पाकिस्तानला चीनचे पुरते पाठबळ आहे हे सांगायला नकोच़
खरेतर बोरेल महाशयांचे प्रतिपादन राष्ट्रा-राष्ट्रातील संबंधांना जितके लागू पडते तितकेच ते भारतासारख्या विशाल देशातील संघराज्यांमधील परस्पर संबंध आणि राज्य केंद्र संबंध यांनाही लागू पडू शकत़े बोरेल यांनी युरोपीय महासंघाच्या युनोतील चर्चेत संपूर्ण जगाच्यावतीने बडय़ा हटवादी राष्ट्रांना चार शब्द सुनावले तसे भारतातील हेकेखोर राजकारण्यांना सुनावणारे कोणी नाह़ी असो, ‘जागतिक घडामोडीं’चा परामर्ष घेताना भारताच्या अंतर्गत परिस्थितीविषयी येथेच लिहिणे योग्य नाह़ी
बोरेल यांचे भाषण खरेच अनेकांना कानपिचक्या देणारे होत़े स्वतःचा विषाणूपासून बचाव करण्यासाठी चेहऱयावर मास्क लावून परस्परांवर गोळ्या झाडण्याचा उद्योग अशा शब्दात त्यांनी लिबियामधील बेबंदशाहीवर भाष्य केल़े हाँगकाँगमध्ये वर्चस्व स्थापन करण्याच्या चीनच्या ‘कायदेशीर’पणाचाही निषेध त्यांनी केल़ा कोरोनावर मात करण्यासाठी जर्मनीने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केल़े अमेरिपेचे लहरी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल मात्र ते उघडपणे बोलल्याचे दिसत नाह़ी जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येणारी मदत थांबविणे, विषाणू पसरविल्याचे निमित्त करून चीनवर युद्ध लादण्याच्या वल्गना करणे या ट्रम्पलीलांवरही परखड भाष्य होणे गरजेचे आह़े तरी झाला इतका उघड उहापोह काही थोडा नाही असे म्हणून युनो आणि तिची नकाराधिकार धारण करणारी बलाढय़ सदस्य राष्ट्रे बोरेलच्या भाषणाने स्वतःत काही बदल करतात का ते पहात राहू!
राजेंद्रप्रसाद मसुरकर, 9960245601