वृत्तसंस्था/ रांची
रविवारी येथे झालेल्या आठव्या राष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत पुरूषांच्या 50 कि.मी. पल्ल्याच्या चालण्यांच्या शर्यतीत गुरप्रीत सिंगने विजेतेपद पटकाविले. त्याने ही शर्यत तीन तास, 59 मिनिटे, 42 सेकंदाचा अवधी घेतला.
या स्पर्धेत शनिवारी भारताच्या संदीपकुमार, राहुलकुमार आणि प्रियांका गोस्वामी यांनी पुढील वर्षी 15 ते 24 जुलै दरम्यान होणाऱया ओरेगॉन विश्व़ ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी 20 कि.मी. चालण्याच्या शर्यतीसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. त्याचप्रमाणे संदीप आणि प्रियांका यांनी टोकियो ऑलिंपिकचे तिकीट आरक्षित केले आहे.