बेळगाव : गुरुवारपेठ टिळकवाडी येथे कचराकुंडी नसतानाही काही नागरिक रस्त्याशेजारी कचरा आणून टाकत आहेत. टाकण्यात आलेला कचरा जनावरे तसेच इतर प्राणी अस्ताव्यस्त पसरवत असल्याने याचा नाहक त्रास स्थानिक रहिवाशांना होत आहे. त्यामुळे रस्त्याशेजारी कचरा टाकणाऱयांवर कारवाई करण्याची मागणी रहिवासी करीत आहेत. बेळगाव शहरात कचरा गोळा करण्यासाठी वाहन असतानादेखील काही बेजबाबदार नागरिक रस्त्याशेजारी कचरा टाकत आहेत. या कचऱयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा परिसर गलिच्छ दिसत असल्याने कचरा टाकणे बंद करणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Previous Articleनव्याने बसविण्यात आलेला हायमास्ट आठ दिवसातच बंद !
Next Article पार्टीत मग्न असणाऱया पीडीओंची बदली करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.