गुऱहाळघरे सुरू करण्यास अडचणींचा सामना ः केवळ वडिलोपार्जित व्यवसाय-परंपरा खंडित होऊ नये यासाठी गुऱहाळघरे सुरू
युवराज पाटील / सांबरा
पूर्व भागातील सर्व गुऱहाळ घरे सुरू झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी गुऱहाळ हंगामात व्यस्त असल्याचे चित्र आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये गुऱहाळ व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याने यंदा काही गुऱहाळ घरे बंद करण्यात आली. गुऱहाळघरे टिकविण्यासाठी शासनाने अनुदान उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱयांतून व्यक्त होत आहे.
पूर्व भागात ऊस पीक मोठय़ा प्रमाणात घेण्यात येते. यातील निम्म्याहून जास्त ऊस साखर कारखान्यांना पाठविण्यात येतो. उर्वरित ऊस गुऱहाळघरांना जातो. यंदा अतिवृष्टीमुळे तब्बल एक महिना उशिरा गुऱहाळघरे सुरू करण्यात आली. त्यामुळे पुढील दोन महिने तरी हा हंगाम चालेल, असा अंदाज गुऱहाळ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
इतर व्यवसायांची वाढलेली मजुरी पाहता मजूर गुऱहाळ घरांमध्ये काम करण्यास कोणीही तयार नाहीत. त्यामुळे गुऱहाळ व्यावसायिकांना मजूर शोधणे कठीण होऊन बसले आहे. पूर्वी गुऱहाळघरात काम करत होते, तेच दरवषी काम करतात. नवीन पिढीला गुऱहाळघरात काम करण्यात रस नसल्याने भविष्यात गुऱहाळ घरात काम करण्यासाठी मजूर मिळणे कठीण होणार आहे. दरवषी या भागातील गुऱहाळ घरांची संख्या कमी होत चालली आहे. सांबरा गावामध्ये तब्बल अठरा गुऱहाळघरे होती. त्यानंतर दहा गुऱहाळघरे सुरू राहिली. यावर्षी त्यातीलही चार गुऱहाळघरे बंद झाली.
पूर्व भागामध्ये मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, माविनकट्टी, पंत बाळेकुंद्री, मोदगा, मारीहाळ, सुळेभावी आदी गावांमध्ये गुऱहाळ हंगाम मोठय़ा प्रमाणावर चालतो. मात्र, यंदा मजुरांची जमवाजमव न झाल्याने व इतर अडचणांमुळे बरीच गुऱहाळघरे बंद झाली आहेत. गुऱहाळ व्यावसायिकांना गुऱहाळघरे सुरू करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. केवळ वडिलोपार्जित व्यवसाय असल्याने व परंपरा खंडित होऊ नये, यासाठी दरवषी गुऱहाळ घरे सुरू करण्यात येत आहेत.
मजुरांच्या टोळय़ा दाखल
पूर्व भागातील ऊस कर्नाटक व महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना पाठविण्यात येतो. सध्या कारखान्यांच्या ऊस तोडणी मजुरांच्या टोळय़ा या भागात दाखल झाल्या आहेत. यंदा पावसामुळे एक महिना उशिरा ऊस तोडणीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे टोळय़ाही उशिराच या भागात कुटुंबीयांसह दाखल झाल्या आहेत. अंदाजे दोन-तीन महिने ऊस तोडणीचा हंगाम असतो, तोपर्यंत या टोळय़ा तळ ठोकून असतात. यंदा शिवारात अजूनही बराच ऊस शिल्लक असल्याने मजुरांच्या टोळय़ा आणखी दोन-तीन महिने तरी राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चाऱयाचा प्रश्न मिटला
उसाचा वरील भाग (वाडी) जनावरांसाठी चारा म्हणून वापरतात. या दरम्यान शेतकऱयांचा चाऱयाचा प्रश्न संपुष्टात येतो. शेतकरीवर्ग मोठय़ा प्रमाणावर चारा घेऊन जातात.
अन् उसाला आले तुरे
यंदा ऊस तोडणीला उशीर झाल्याने सर्व उसाला तुरे आले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग लवकर ऊस तोडणी करण्यासाठी धडपडत आहेत. याचाच फायदा घेत ऊस तोडणीसाठी टोळीवाल्यांकडून जादा एन्ट्री मागण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱयांना भुर्दंड बसत आहे.
शासनाने अनुदान देण्याची मागणी
पूर्व भागामध्ये गुऱहाळ व्यावसायिकांनी वडिलोपार्जित व्यवसाय अद्याप जिवंत ठेवला आहे. गुऱहाळघर चालविण्यासाठी उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत आहे. यासाठी शासनाने याची दखल घेऊन गुऱहाळ घरांना अनुदान देणे गरजेचे आहे. गुऱहाळ घराना अनुदान दिले तरच हा व्यवसाय पुढेही चालू शकणार आहे. लोकप्रतिनिधींनीही शासनाचे लक्ष वेधणे गरजेचे आहे.
नवीन गुळ बेळगाव बाजारपेठेत उपलब्ध
नवीन गुळ सध्या बेळगाव बाजारपेठेत दाखल झाला असून 3500 ते 4000 प्रति क्विंटल असा दर आहे.
मजूर मिळणे झाले कठीण
गुऱहाळ घरांमध्ये किमान 16 ते 18 मजुरांची आवश्यकता असते. त्यांना कामाच्या मोबदल्यात ठराविक गुळ देण्यात येतो. यावषी काही मजूर गुळाऐवजी रक्कम मागत असल्याने गुऱहाळ व्यावसायिकांना अडचणीचे जात आहे. गुळाच्या बदल्यात रक्कम देणे परवडणारे नसल्याने मजुरांची जमवाजमव करणे गुऱहाळ व्यावसायिकांना कठीण होऊन बसले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास पुढील काही वर्षांमध्ये गुऱहाळघरांची संख्या आणखी कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.