गूळ दरात वाढ : कांदा-बटाटा दर स्थिर
वार्ताहर/ कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नागपंचमीच्या तोंडावर गूळ दरात 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर कांदा आणि बटाटय़ाचे भाव मात्र स्थिर आहेत.
बुधवारी बाजारात कांदा आवक 50 ट्रक इतकी झाली. यामध्ये कर्नाटकातून 20 ट्रक तर महाराष्ट्रातून 30 ट्रक कांदा आवक झाली. बाजारात आवक-जावक स्थिर असल्याने कांद्याचे भावसुद्धा स्थिर आहेत, अशी माहिती व्यापारी अशोक पवार यांनी दिली.
बाजारातील कांद्याचे भाव
गोळी 300 ते 600
मध्यम आणि गोळा 800 ते 900
चांगल्या प्रतीचा महाराष्ट्रीयन ठेवणीचा कांदा 1000 ते 1200
सफेद कांदा 1100 ते 1400 रुपये
बुधवारी परराज्यातील बटाटा आवक 11 ट्रक इतकी झाली होती. त्यामध्ये इंदूर 6, आग्रा 4 तर डिसा गुजरात 1 ट्रक बाजारात मागणीप्रमाणे आवक झाली होती. बटाटय़ाचे भावसुद्धा स्थिर होते, अशी माहिती व्यापारी तुषार टुमरी यांनी दिली.
बटाटय़ाचे भाव
इंदूर 2400 ते 2650
आग्रा 2300 ते 2400
डिसा गुजरात 2200 ते 2250
नागपंचमीनिमित्त
गुळाचे भाव वधारले
नागपंचमीनिमित्त गुळाचे भाव 200 रुपयाने वधारले आहेत. जुन्या गुळाला चांगली मागणी आहे. जुन्या गुळाचा भाव 400 ते 3800 रुपये असा आहे. नवीन गूळ आवकही रायबाग परिसरातून होत आहे. तर जुना गूळ हा स्थानिक असून हा ठेवणी केलेला गूळ असल्याची माहिती गूळ व्यापारी मंदार घाटगे यांनी दिली.