ऑनलाईन टीम/तरुण भारत
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सोमवारी पुलवामामधील केंद्रीय रिजर्व्ह पोलीस दल कँपमध्ये मुक्काम केला. यावेळी काल रात्री अमित शहा यांनी सीआरपीएफ कँपमध्ये थांबून जवानांसोबत जेवले. याबाबतची माहिती अमित शहा यांनी स्वतः ट्वीट करत सांगितली होती.
अमित शहा यांच्यासोबत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा देखील सीआरपीएफ कँपमध्ये होते. अमित शहा यांनी पुलवामा येथे पोहोचल्यानंतर काश्मीरमधील दहशतवाद आणि दगडफेकीच्या घटनांवर आपले मत मांडले. ते म्हणाले की, ‘दहशतवाद्यांविरोधात मोदी सरकारचे झिरो टॉलरेंस नीती असून सर्वसामान्यांना वाचवणे हे आमचे प्राधान्य आहे.’ शिवाय शहा म्हणाले की, ‘पूर्वी कश्मिरमधून दगडफेकीच्या घटना खूप ऐकू येत असे. पण आजची परिस्थिती वेगळी आहे, ‘ असे ते म्हणाले.