सांखळी / प्रतिनिधी
राज्यात गेल्या आठ वषी पासून खाण व्यवसाय बंद असल्याने ट्रक मालक अडचणीत सापडले आहेतच मात्र त्याहूनही मोठे संकट गैरेंज मालक व सुटेभाग विक्री करणाऱयावर आलेले दिसत आहे प्रत्येक वषी सरकार खणीसुरू होणार असे सांगत असल्याने ट्रक मालक गाडी दुरुस्त करून घेतात पण पैसे काम सुरू झाल्यावर असे सांगितले जात असल्याने सांखळी मतदारसंघात अनेक गैरेंज मालक आणि सुटे भाग विपेते अडचणीत सापडले असून खाणी कधी सुरू होणार आणि आपले पैसे कधी भेटणार याची प्रतीक्षा करताना दिसत आहे मात्र यंदाच्या वषी खाणी सुरू होणार या विश्वासा ने ट्रक मालकांनी दुरुस्ती कामाचा जोर लावलेला दिसत आहे ङ
ङखाण पट्टय़ातील व्यवसाय धोक्मयातङ सांखळी मतदारसंघात एक नगर पालिका आणि सहा ग्रामपंचायती आहेत मात्र येथील पूर्ण व्यावसायिक खाण व्यवसायावर अवलंबून आहेत पाळी, वेळगे, सुर्ला, कुडणे, हरवळे, न्हवेली, आमोणत् आणि सांखळी शहर या परिसरात मोठया प्रमाणात ट्रक मालक, गैरेंज मालक, खाण कामगार आहेत आणि येथील व्यवसाय ही खाणी वर अवलंबून आहे हे काही वर्षात स्पष्ट दिसत आहे कर्ज बाजारी झालेल्याना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे मार्केटमध्ये पैसाच नसल्याने उदारी वसूल होत नसल्याने अनेक व्यावसायिक संकटात सापडलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे स्थानिक पेडिट सोसायटीच्या आणि बॅ?केच्या समोरही वसुली कशी करावी हा मोठा प्रश्न ही उपस्थित होत आहे
खाण पट्टीतील नागरिकांना हवंय काम एके वेळी खाण व्यवसाया मुळे राज्याची आर्थिक बाजू सांभाळणाऱया पाळी मतदारसंघातिल स्थनिक नागरिकांची परिस्थिती खूपच खालावलेली दिसत आहे एके काळी महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील हजारो कामगारांना नोकरी देणारा हा मतदारसंघ आज खाण बंदी मुळे आर्थिक संकटात सापडला आहे मतदारसंघाचे नाव बदलले (आता सांखळी)मात्र या भागात दुसरे कसलेही काम सरकार उपलब्ध करून देऊ शकले नाही तरीही खाण व्यवसाय सुरू होणार या आशेने खाण अवलंबित वावरत आहे असा विश्वास ही लोक सरकार प्रति व्यक्त करत आहेत येथे ग्रामीण भागात बेरोजगार युवक युवतीची सांख्य वाढतच आहे खाणी जर भविष्यात सुरु होण्याची शक्मयता नसेल तर सरकारने मतदारसंघात नवीन पर्याय शोधून बेरोजगार युवावर्ग च्या हाताला काम द्यावे अशी मागणी होत आहे ङ30 वर्षे जोडलेला पैसा 9 वषीत गमावला : रामा गावकरङसांखळी मतदारसंघात सहा नामवंत खाण कंपन्या कार्यरत होत्या म्हणून मी 30 वषी पूर्वी एक ट्रक घेतला आणि व्यावसाय सुरू केला कालांतराने दुसरा ट्रक घेतला आणि साळगावकर, बांदोडकर या कंपन्यात खनिज वाहतूक करण्याचे काम केले यात थोडा फार पैसाही कमावला मात्र खाण बंदी मुळे गेल्या नऊ वर्षांत कमाई शुन्य असल्याने गेल्या30 वर्षत कमावलेले पैसे गमावण्याची पाळी आमच्यावर आली आहे त्यात सरकार खनिज वाहतूक लवकरच सुरू होणार असे सांगत असल्याने उदारीवर गाडीचे का करून घेतले आहे यंदाही खाणी सुरू न झाल्यास खर्च झालेले 1लाख50हजार रुपये कसे फेडायचे हाही प्रश्न समोर येत आहे असे मत वेळगेतील ट्रक मालक रामा गावकर यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले